शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त आध्यात्मिक गुरू

By admin | Updated: November 19, 2014 00:00 IST

स्वामी सदाचारी- एकेकाळी आध्यात्मिक गुरू व तांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी सदाचारी यांना कुंटणखाना चालवण्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खावी लागली आहे.जयेंद्र सरस्वती- स्वामिगल कांची कामकोटी पीठाचे ६९वे शंकराचार्य असणारे स्वामी जयेंद्र सरस्वती यांना मंदिरातील कर्मचा-याच्या खुनाच्या आरोपावरून नोव्हेंबर २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.स्वामी परमहंस नित्यानंद - तामिळनाडूतील एक मोठे ...

स्वामी सदाचारी- एकेकाळी आध्यात्मिक गुरू व तांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी सदाचारी यांना कुंटणखाना चालवण्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खावी लागली आहे.

जयेंद्र सरस्वती- स्वामिगल कांची कामकोटी पीठाचे ६९वे शंकराचार्य असणारे स्वामी जयेंद्र सरस्वती यांना मंदिरातील कर्मचा-याच्या खुनाच्या आरोपावरून नोव्हेंबर २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.

स्वामी परमहंस नित्यानंद - तामिळनाडूतील एक मोठे अध्यात्मिक गुरू असणा-या स्वामी नित्यानंद यांचे परदेशातही अनेक भक्त आहेत. संपूर्ण तामिळनाडू राज्यासह वाराणसी व पुरी येथे त्यांचे अनेक आश्रमही आहेत. अनेक भक्तांच्या आदर्शस्थानी असणा-या नित्यानंद यांची एका न्यूज चॅनेल सेक्स टेप प्रसारित केली होती. त्यानंतर ते वादाचा भोव-यात सापडले.

गुरमीत राम रहीम सिंग- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिरसा येथील कार्यालयातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर असून एका खून प्रकरणातील सहभागाबाबतही त्यांची चौकशी सुरू आहे.

आसाराम बापू- आध्यात्मिक गुरू आसाराम बापू व त्यांच्या मुलाने आपले शोषण केल्याचा आरोप दोन बहिणींनी लावला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी त्यांना अटकही करण्यात आली होती तर त्यांचा मुलगा फरार झाला होता. मात्र अनेक महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यांच्या गुरूकुलातील दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणीही त्यांच्यावर संशयाची सुई असून त्यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आसाराम यांच्यावर आहे.

नेमीचंद जैन उर्फ चंद्रास्वामी - नेमी चंद जैन उर्फ चंद्रास्वामी हा तथाकथित ज्योतिषी असून त्याच्यावर फेराअंतर्गत नऊ गुन्हे तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रेमानंद तामिळनाडूतील तिरूचिरापल्ली आश्रमातील स्वामी प्रेमानंद यांना १३ महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तसेच एका श्रीलंकन नागरिकाचा खून केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

संत रामपाल यांच्यावरील खुनाचा आरोप व अटक प्रकरणामुळे अध्यात्मिक गुरूंच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वादग्रस्त कृत्य अथवा वक्तव्यांमुळे देशातील अनेक गुरू अडचणीत सापडले असून अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. संत रामपाल यांच्या खुनाचा आरोप असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. रामपाल यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या आश्रमात गेले असता हजारो भक्तांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना अडवले. या धुमश्चक्रीत पोलिसांसह अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.