शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट; केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 11:19 AM

गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत.

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये अद्यापही काही प्रमाणात तणाव कायम आहे. अशातच केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला एक गंभीर इशारा देत सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्राने राज्यांना, उद्योग आणि संशोधन संस्थांना संशयास्पद आणि अनपेक्षित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात असे बियाणे यात असू शकतात, असं इशारा केंद्राने दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत. या अनपेक्षित पार्सलच्या माध्यमातून साथीचा रोग पसरू शकतो. आणि जर बियान्यांमार्फत साथीचा रोग पसरला तर त्याला नियंत्रणात आणणे अवघड होईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील संशोधन आणि उद्योगसंस्थाना विविध कारणामुळे काही बियाण्यांचे पार्सल येतील. जर ते पार्सल अनपेक्षित आणि संशयास्पद असतील तर अशा बियाणांच्या पार्सलबाबत जागृत राहण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

याविषयी बोलताना कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आपण आधीच चीनमधील कोरोनाशी लढाई करत आहोत. आता जर बियाण्यांद्वारे साथीचा रोग आला तर ते हाताळणे कठीण होईल. आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

बियाण्यांद्वारे वनस्पतींचे रोग पसरवता येतील ही केवळ एक चेतावणी आहे. त्याला 'सीड टेररिजम' म्हणणे योग्य नाही. कारण बियाण्यांद्वारे रोगाचा प्रसार करण्याच्या मर्यादा आहेत. पण तरीही धोका आहे. अशा पार्सलमधून येणारी बियाणे तण असू शकते जी भारतातील मूळ झाडे आणि वनस्पतींसाठी धोकादायक ठरू शकते, असं फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडियाचे महासंचालक राम कौदिन्य यांनी सांगितलं.

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार