शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांवर केंद्राचा अंकुश

By admin | Updated: April 13, 2015 06:00 IST

राज्यपालांनी आपल्या संबंधित राज्यात वर्षातून किमान २९२ दिवस राहिलेच पाहिजे आणि राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय राज्याच्या बाहेर दौरा करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यपालांना

नवी दिल्ली : राज्यपालांनी आपल्या संबंधित राज्यात वर्षातून किमान २९२ दिवस राहिलेच पाहिजे आणि राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय राज्याच्या बाहेर दौरा करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यपालांना दिले आहेत.काही राज्यांचे राज्यपाल बहुतांश काळ आपल्या संबंधित राज्याच्या बाहेरच वेळ घालवितात, असे लक्षात आल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने हे नवे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमावलीत म्हटले आहे, की राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय अथवा आकस्मिक किंवा अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रपती सचिवालयाला पूर्वकल्पना दिल्याशिवाय कोणताही दौरा आयोजित करू नये. शेवटच्या क्षणी दौरा आयोजित करायचा झाल्यास राज्यपालांना त्या दौऱ्यामागच्या कारणांचा खुलासा करणे अनिवार्य राहील. राज्याबाहेर दौरा करावयाचा झाल्यास तसे एक ते सहा आठवड्यांपूर्वी राष्ट्रपतींना कळवावे लागेल आणि दौरा खासगी आहे की सरकारी आणि तो देशांतर्गत आहे की विदेशात, यावर त्या दौऱ्याला परवानगी दिली जाईल. राज्यपालांना दौरा करण्यापूर्वी आपली विनंती पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडेही पाठवावी लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)