शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पासाठी केंद्राचे ९१५ कोटी

By admin | Updated: November 21, 2014 02:11 IST

राज्यातील वेगवर्धित सिंचन लाभ योजनेतील (एआयबीपी) २० प्रकल्पांसाठी ९१५ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असून,

नवी दिल्ली : राज्यातील वेगवर्धित सिंचन लाभ योजनेतील (एआयबीपी) २० प्रकल्पांसाठी ९१५ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असून, अजून ७४३ कोटींची मागणी केल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, केंद्रीय जलसंसाधन सचिवांनी स्वत: खडसे यांची भेट घेऊन राज्यातील प्र्रकल्प केंद्रात अडणार नाहीत, असे सांगितले.केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलमंथन कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात राज्यातील अधिकाधिक प्रकल्प जोडण्याचा आपला मानस आहे. सध्या १८ प्रकल्प अहवाल तयार होत असून, दोन मोठे प्रकल्प मान्यतेच्या स्थितीत आहेत. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पातील सातपुडा पर्वतरांगामधून वाहणारी तापी मेगा रिचार्ज स्कीम, कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे आणून या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावणारी कृष्णा-भीमानदी पाणीपुरवठा योजना राष्ट्रीय प्रकल्प करावा. त्याचबरोबर टेकड्यांना बोगदे पाडून नर्मदेचे सहा टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणारी नर्मदा-तापी लिंक योजनांना तातडीने कार्यान्वित करण्यासह राज्याच्या सीमेवरून अांध्र प्रदेशाकडे जाणारी प्राणहिता व वैनगंगा या नदीचे पात्र वळवून वैतरणा-गोदावरी, नारपार-गिरणाव या महत्त्वाकांक्षी योजनांचे सर्वेक्षण, प. महाराष्ट्रातील टेंभू व नवीन उरमोडी, विदर्भातील जीगाव व निम्म पैनगंगा प्रकल्प तसेच दुरुस्ती, नूतनीकरण पुनर्जीवित (थ्रीआर) या योजनेतून पूर्व विदर्भातील सुमारे ६ हजार माजी मालगुजारी तलावांना विकसित करण्यासाठी केंद्राने ते ताब्यात घेऊन त्यांना १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. मराठवाडा व खान्देशातील काही तलावांना अशी मदत केंद्राने दिली आहे. यातील अनेक प्रकल्पांबाबत केंद्र सरकार अनुकुल असून, काही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी फेरछाननी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)