शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

एक मुद्दा, तीन भूमिका; राजकारणासाठी भाजपाचं काय पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 9:46 AM

वीज दरवाढीवरुन तीन राज्यांमध्ये तीन भूमिका

नवी दिल्ली: राजकारण करण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जातात, असं म्हटलं जातं. आधी विरोध करायचा, मग समर्थन करायचं किंवा आधी समर्थन करायचं आणि त्यानंतर विरोध करायचा, अशा भूमिका राजकीय पक्षाकडून अनेकदा घेतल्या जातात. सध्या भाजपाच्या बाबतीत याचा प्रत्यय येत आहे. एक देश, एक कर अशी भूमिका घेत जीएसटी लागू करणाऱ्या भाजपानंवीज बिलाच्या मुद्द्यावरुन तीन राज्यात तीन भूमिका घेतल्या आहेत.दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०० युनिट्सपर्यंतची वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय २०१ ते ४०० युनिट्सपर्यंतच्या विजेच्या वापरावर ५० टक्के अनुदान देणार असल्याची घोषणादेखील आम आदमी पक्षानं केलं. गेल्या महिन्यात केजरीवाल यांनी घेतलेल्या या निर्णयावरुन जोरदार राजकारण झालं. आप बुडतं जहाज असून निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा स्टंट केल्याची टीका भाजपा नेते विजेंदर गुप्ता यांनी केली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील विजेचे दर १२ ते १५ टक्क्यांनी वाढणार आहेत. यावरुन विरोधकांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. मात्र राज्याचे उर्जा मंत्री श्रीकांत शर्मांनी या दरवाढीचं समर्थन केलं आहे. सरकारनं ग्राहकांचा विचार करुन कमीत कमी दरवाढ केल्याचा दावा त्यांनी केला.  उत्तर प्रदेशात दरवाढीचं समर्थन करणाऱ्या भाजपानं पश्चिम बंगाल सरकारमध्ये मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल सरकारनं काही दिवसांपूर्वीच विजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ११ सप्टेंबरला भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. विजेची दरवाढ म्हणजे सर्वसामान्यांची लूट असल्याची टीका भाजपानं केली आहे.  एक देश, एक कर म्हणत मोदी सरकारनं देशात जीएसटी लागू केला. मात्र विजेच्या दरवाढीवरुन भाजपानं तीन राज्यांमध्ये तीन भूमिका घेतल्या आहेत. सध्या देशात नव्या मोटार वाहन कायद्याची चर्चा आहे. मात्र यावरुनही मोदी सरकारला धक्का बसला आहे. भाजपाची सत्ता असलेल्या पाच राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी थांबवली आहे. त्याआधी गोवंश सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असतानाही भाजपामधील मतमतांतरं समोर आली होती. उत्तर भारतात गोवंश सुरक्षेचा मुद्दा रेटणाऱ्या भाजपानं ईशान्य भारतात मात्र वेगळी भूमिका घेतली होती. 

टॅग्स :electricityवीजBJPभाजपाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालwest bengalपश्चिम बंगालUttar Pradeshउत्तर प्रदेश