शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 12:58 PM

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला.

ठळक मुद्देराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत.

जयपूर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. याचदरम्यान, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, "मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे, असे ठरवले. तर, मुस्लिम आपल्यापासून अंतर ठेवतात. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदू धर्माशी संबंधित आहेत. यानंतर संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्मात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 50 मुस्लीम कुटुंबीयांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला."

गावातील हरजीराम यांच्या म्हणण्यानुसार, कांचन ढाढ़ी जातीचे हे संपूर्ण कुटुंब बर्‍याच वर्षांपासून हिंदू रूढी-परंपरा  पाळत होते. दरवर्षी ते आपल्या घरात हिंदू सण साजरे करतात. याच कुटुंबीयातील विंजारम यांनी सांगितले की, "मुस्लीम रीति-रिवाजांनुसार आम्ही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. रामजन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी आम्ही सर्वांनी होम-हवनचा कार्यक्रम आयोजित केला आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करून स्वेच्छेने हिंदू धर्मात परतलो. यासाठी कोणाचाही दबाव नाही."

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत. विंजाराम यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर, या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला. तर गावचे सरपंच प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRajasthanराजस्थान