शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 6:14 PM

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण प्रकरणावर निकाल दिला आहे. शेकडो वर्षांचा इतिहास होता. भारताची लोकशाही किती जिवंत आहे हे जगाने पाहिले. देशातील प्रत्येक नागरिकाने खुल्या मनाने निकाल स्वीकार केला आहे. भारत ज्याच्यासाठी ओळखला जातो विविधतेत एकता याचा मी गर्वाने उल्लेख करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहेत. 9 नोव्हेंबर हा असा दिवस आहे जेव्हा बर्लिनची भींत कोसळली होती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांच्या आहेत. आजची तारीख अयोध्या निकाल आणि करतारपूर कॉरिडॉरसाठी महत्वाची होती, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधताना म्हटले.

आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे. या प्रकरणांवरून कोणाच्या मनात कटुता उरली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा आजचा दिवस आहे. न्यायालयाने देशाला कठीणातला कठीण विषय संविधानाच्या माध्यमातून सोडविता येतो, असा संदेश दिला आहे. भारताचे संविधान, न्यायिक प्रणाली यावर आपला विश्वास तसाच रहावा हे महत्वाचे आहे. हा निकाल नवीन पहाट घेऊन आला आहे. या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. मात्र, नव्या पिढीने नवी सुरुवात करावी, नवीन भारताची सुरुवात करावी. माझ्या सोबत चालणारा कुठे मागे तर राहिला नाही ना, याची दक्षता घ्यावी, असेही मोदी म्हणाले.

राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर देशाच्या निर्माणाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रत्येक भारतीयाने त्याचे दायित्व, कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारतासमोर आव्हाने अनेक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मात करावी, असे आवाहनही मोदी यांनी देशवासियांना केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर