शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
4
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
5
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
6
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
7
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
8
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
9
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
10
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
11
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
12
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
13
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
14
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
15
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
16
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
17
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
18
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
19
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
20
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा

..तर दक्षिण मुंबईवर पुन्हा आघाडीचा वरचष्मा?

By admin | Published: September 23, 2014 2:30 AM

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी

जमीर काझी- मुंबई लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने येत्या विधानसभेच्या रणसंग्रामात आघाडीच्या उमेदवाराचे पानिपत होण्याची अपेक्षा असताना महायुती फुटल्यास हे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केल्यास आघाडीला ६ पैकी सध्याच्या ४ जागा राखता येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणाहून सेनेचे अरविंद सावंत पावणेदोन लाखांवर मतांनी विजयी झाले होते. त्यात वरळी मतदारसंघातून त्यांना ३५ हजारांवर मताची आघाडी मिळाली होती. मात्र आता या ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे राहिल्यास गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर सलग चौथ्यांदा सहजपणे निवडून येऊ शकतील. सध्याच्या फॉर्मुल्यानुसार ही जागा सेनेच्या वाट्याला असून त्यांच्याकडून आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपामधूनही त्यासाठी इच्छुक असून त्याचा फायदा अहीर यांना होऊ शकतो. मनसेची हवा नसली तरी त्या उमेदवारीचा फायदा कॉँग्रेस आघाडीला होईल.शिवडी मतदारसंघात प्रतिनिधित्व करीत असलेल्या मनसचे गटनेते बाळा नांदगावकर यांना पुन्हा निवडून येणे अशक्य असल्याने ते पुन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक नाहीत. मात्र युती तुटीत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भायखळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात उघडपणे नाराजी आहे. विशेषत: मुस्लीम उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. गेल्यावेळी सेना व कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा त्यांना मिळाला होता. या वेळी गवळीची कन्या गीता गवळी इच्छुक असून, सेनानेतृत्व त्यासाठी राजी असल्याचे सांगितले जात आहे. मुस्लीमबहुल मतदार असलेल्या मुंबादेवीमध्ये लोकसभेत कॉँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार अमीन पटेल पुन्हा निवडून येण्याबाबत आशावादी आहेत. युती तुटल्यास त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांचे तिकीट व विजय जवळपास निश्चित आहे. सेनेने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मात्र त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याउलट कॉॅँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळू शकणार आहे. कुलाब्यात कॉँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांना गेल्यावेळी भाजपाच्या राज पुरोहितांनी चांगली झुंज दिली होती. मात्र या वेळी स्वतंत्र लढल्यास अ‍ॅनी शेखर यांना त्याचा थेट फायदा होईल. मनसेचे या ठिकाणी स्थान नगण्य आहे.