शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकलनंतर पोलिटिकल वॉर सुरू

By admin | Updated: October 8, 2016 05:37 IST

भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- २८ सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना. भाजपच्या नेतृत्वाने कितीही नकार दिला तरी याबाबीचे ते राजकीय भांडवल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने भाजपवर टीका करण्यापूर्वी १९७१ च्या युद्धाकडे जरा पाहावे, असा सल्लाही शहांनी दिला आहे. काही उत्साही भाजप जिल्हाध्यक्षांना याबाबत पोस्टरबाजी करण्यास त्यांनी मनाई केली आहे. मात्र, लष्कराच्या कारवाईमागे समर्थ राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ होते, असे आश्चर्यकारक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हे कमी म्हणून की काय, भाजपा या घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे, असे दिसते.दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपला या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा मिळू नये, यासाठी सरसावले आहेत. राहुल गांधी यांच्या खून की दलाली या वक्तव्यावरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली असल्याने विरोधकांतही गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसते. भाजपच्या जाळ्यात काँग्रेसने अडकू नये, असे जनता दल (यू)सह काही मित्र पक्षांनी आवाहन केले आहे. प्रशांत किशोर म्हणतात की, या घडीला लष्कराची प्रशंसा करा आणि राजकीय टीका टाळा. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्ष मुख्यालयात अचानकपणे पत्रकार परिषद घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या रक्ताच्या मागे लपत असून, त्यांच्या बलिदानाचे राजकीय शोषण करीत असल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी केला होता. सर्जिकल स्ट्राईकवरील विधानांवरून अरविंद केजरीवाल अडचणीत आले होते. त्यांच्यावर चोहीकडून टीकेचा भडिमार सुरू होता. राहुल यांच्या विधानांमुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला, असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सर्जिकलबाबत केलेली विधाने पाकिस्तानात गाजली. मात्र, त्यामुळे पंजाबमधील त्यांचे समर्थक चिंतातुर झाले आहेत. >केवळ सैन्याचा सत्कार केला पाहिजे...बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली. सर्जिकल स्ट्राइकबाबत केवळ सैन्याचा सत्कार केला गेला पाहिजे ना की पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्याचा, असे त्या म्हणाल्या. स्ट्राइकबद्दल मनोहर पर्रीकर यांचा गुरुवारी मथुरेत सत्कार करण्यात आला. मायावतींचा रोख त्याकडेच होता. >पाकिस्तानचे भारताच्या नावाने बोटे मोडणे सुरूचकाश्मीरमधील जनतेवर सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारांचा निषेध करतानाच, आम्ही काश्मिरी जनतेच्या लढ्यात सोबत आहोत, कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे, असा ठराव शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत एकमताने संमत करण्यात आला. काश्मीरमधील जनतेवरील अत्याचार रोखण्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.