शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 8:53 AM

योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधीचा लाभ देशात ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतला असून, त्यांच्याकडून सरकार २९,९२७ कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे ४,४५,४९७ जण अपात्र असून, ते सरकारचे ३५८ कोटी रुपये देणे लागतात. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण ४२,१६,६४३ अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून २९,९२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम (८.३५ लाख), तामिळनाडू (७.२२ लाख), पंजाब (५.६२ लाख) आणि महाराष्ट्रातील (४.४५ लाख) आहेत. 

सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १.१० कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले.  लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी १२,५४५ रुपये मिळाले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारे करतात.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?

अहमनगर (६.८६ लाख), सोलापूर (६.२० लाख), कोल्हापूर (५.४७ लाख), सातारा (५.२९ लाख ) आणि पुण्यातील (५.१४ लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते. ठाणे (१.१९ लाख), नंदूरबार (१.२८ लाख), पालघर (१.३१ लाख), रायगड (१.५२ लाख), गडचिरोली (१.५२ लाख) आणि सिंधुदुर्गच्या (१.५४ लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र