शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Video - बसपा पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांनीच गाढवावरून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 6:38 PM

राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला.जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली.

जयपूर - राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) बसपाच्या कार्यकर्त्यांनीच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आणि उपाध्यक्ष रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील बसपाचे कार्यकर्ते हे आपल्याच पक्षातील काही लोकांमुळे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथे आलेल्या बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकांसह दोघांना नाराज असलेल्या काही कार्यकर्त्यांनी घेरलं. तसेच दोन गाढवं आणि हातात ग्रीस घेऊन कार्यकर्ते आले होते. त्यांनी रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला. तसेच जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेनंतर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसने आधी राजस्थानमध्ये बसपाचे आमदार फोडले आणि आता राज्यातून आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी बसपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. राजस्थानात जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने घडवून आणलेल्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील मायावती यांनी दिला आहे. 

राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने याआधीही काही दिवसांपूर्वी मायावती संतप्त झाल्या होत्या. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला होता. तसेच आपल्या ट्विटमध्ये ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे'' असं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थान