शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

देशात पावसाची १४ टक्के तूट; परतीच्या पावसानेही दिला दगा

By admin | Updated: October 20, 2015 03:41 IST

देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे.

नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात तर पावसाची तब्बल ३३ टक्के एवढी तूट नोंदली गेली आहे. परतीच्या पावसानेही यंदा दगा दिला आहे. गेल्या दशकात २००२ व २००९ मध्ये देशात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यात अनुक्रमे १९.२% व २१.८% तूट होती.विशेष म्हणजे २००९ मध्ये एकीकडे जागतिक मंदीचे संकट असताना दुसरीकडे मान्सूनने सुद्धा भारताला दगा दिला होता. तर १९७९ मध्ये १९% कमी पाऊस झाला होता. १९७९ नंतरचे हे सर्वात कमी चौथ्या क्रमांकाचे पर्जन्यमान आहे. २००२ मध्येही देशात पावसाने मोठी ओढ दिली होती. यंदा देशात ८८७.५ मिमी सर्वसाधारण पर्जनाच्या तुलनेत जून ते सप्टेंबरमध्ये ७६० मिमी पाऊस झाला. २०१४ मध्ये देशात ७८१.७ मिमी पाऊस झाला होता.आभाळाकडे डोळे लागलेल्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच देशाच्या उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होऊनही देशातील या महिन्यामधील एकूण पर्जन्यमान २००५ नंतर सर्वात कमी होते. सप्टेंबरमध्ये भारतात सर्वसाधारणपेक्षा २४% कमी म्हणजे १३१.४ मिमी पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) दुष्काळ नाही !भारतीय हवामान शास्त्र विभाग मात्र देशातील पावसाच्या या स्थितीस दुष्काळ मानण्यास तयार नाही. कारण संपूर्ण देशात पाण्याची एकसारखी स्थिती नसते. एल निनोचा प्रभाव यंदाच्या कमी पावसास कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी पावसाचे प्रदेशउत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी ओढ दिली.