शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांवर मायेची सावली...

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

भटक्या कुत्र्यांवर मायेची सावली...

रस्त्यात श्वान दिसले की, बहुतेकांच्या तोंडी ‘हाड-हाड’ असेच शब्द येतात. मग या कुत्र्यांना प्रेम, लळा लावणे दूरच. बरेच जण घरात कुत्री पाळतात, त्याची सगळी काळजीही घेतात. रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे पाहून मात्र नाके मुरडतात. अशाच बेवारस कुत्र्यांसाठी काठे गल्ली येथील सुखदा गायधनी ही युवती गेल्या चार वर्षांपासून जिद्दीने काम करीत आहे. सुखदाला लहानपणापासून प्राण्यांची प्रचंड आवड. चार वर्षांपूर्वी तिने ठाण्याहून पाश्चात्त्य प्रजातीचे कुत्र्याचे पिलू पाळण्यासाठी घरी आणले. त्याच्याशी खेळायला बाहेरची कुत्रीही घरात येऊ लागली. मग सुखदाने या भटक्या कुत्र्यांचीही काळजी घ्यायला सुरुवात केली. रस्त्यावर एखादे कुत्रे आजारी दिसले की, ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागली, जखमी कुत्र्यांवर प्रथमोपचार करू लागली, त्यांना इंजेक्शन्स देऊन आणू लागली. काही महिन्यांपूर्वीच निधन झालेले सायकलपटू हर्षद पूर्णपात्रे हे तिच्या परिचयाचे. त्यांच्या मदतीने तिला आणखी सहकारी येऊन मिळाले. विमल ममानिया, निखिल पुरोहित, देविका भागवत आदि २०-२२ तरुण-तरुणींनी मिळून ‘अ‍ॅनिमल केअर एम्पॉवर्ड’ नावाचा ग्रुप स्थापन केला. आता या गु्रपच्या स्वयंसेवकांना शहराच्या निरनिराळ्या भागांतून फोन येतात. त्या भागातला स्वयंसेवक जाऊन कुत्र्यावर उपचार करतो, डॉक्टरकडे नेतो, कुत्रा बरा होईपर्यंत स्वत:च्या घरी नेऊन त्याची शुश्रूषाही करतो. बऱ्याचदा डॉक्टरही या कुत्र्यांवर मोफत उपचार करतात. आजार गंभीर असेल तर ग्रुपचे स्वयंसेवक खिशातून पैसे टाकून उपचार करवून घेतात. शहरात कुत्र्यांसाठी निवाराघर बांधण्याचा या ग्रुपचा प्रयत्न असून, त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. सुखदा ही भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठीही प्रबोधन करते. महापालिकेलाही ती मदत करते. या शस्त्रक्रियांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करवून घ्यायला हव्यात, असे तिचे म्हणणे आहे. कुत्र्यांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहू नये. कुत्रा हा ठरावीक ठिकाणी समूहाने राहणारा प्राणी आहे. कुत्री रात्री आपापल्या भागाचे रक्षण करतात. कोणी नवा माणूस दिसला की, त्याच्या अंगावर धावून जातात खरी; पण चावण्याच्या घटना खूप कमी घडतात. उलट माणसेच कुत्र्यांना दगड वगैरे मारून उपद्रव देतात. मग त्याचा राग मनात धरून कुत्री कधीकधी हिंसक होतात. माणसांनी कुत्र्यांविषयीची मानसिकता बदलायला हवी, असे सुखदा तळमळीने सांगते. सुखदाचे हे काम जसे ‘हटके’ आहे, तसेच ते प्राण्यांविषयी समाजाला नवा दृष्टिकोन देणारेही ठरत आहे.