शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कांदा विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:59 IST

परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे.

नायगाव : परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. कांदा रोपांच्या नुकसानीमुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होण्याचे चित्र आहे.
यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने कहर करून शेतपिकांचे अतोनात नुकसान केले. खरिपातील कांद्याचे हजारो हेक्टरवरील पीक नाहीसे झाले आहे. शेतकºयांनी महागड्या दराने कांदा रोपे घेऊन पुन्हा लागवड केली, मात्र परतीच्या पावसाने या कांद्याचेही नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची झाली आहे.
शेतकºयांनी रब्बीच्या कांद्याचे महागडे बियाणे अनेकदा तयार केले, मात्र परतीच्या पावसाने खराब झाले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील कांद्याचेही नियोजन कोलमडल्याने कांदा लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी कांदा पिकाऐवजी अन्य पिकांना पसंती दिली आहे.
गव्हाचे वाढणार उत्पादन
शेतकºयानी कांदा पिकाच्या क्षेत्रात यंदा गव्हाच्या पिकाला पसंती दिल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. येणाºया काळात शेतकºयांही कांदा विकत घेण्याची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर नवल वाटायला नको. यावर्षी शेतकºयांबरोबरच कांदा सर्वांनाच रडविणार, असे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी