शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:39 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही महिन्यांपासून इंदिरानगर परिसरात पाण्याची पळवापळवी होत असून, त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या व्हॉल्व्हमन व चेकर यांच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही गेल्या आठवड्यापासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी पाटील गार्डनसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळास बारीक धारेने पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम भरले जात असताना वापरायला पाणी आणायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे खासगी टॅँकर मागवावे लागत आहे. धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही टंचाईचा सामना करावा लागत असेल तर उन्हाळ्यात काय होणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत होता, परंतु कुलूप काढताच पाण्याची पळवापळवी करण्यात येत आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक ३०च्या नगरसेवकांनी प्रभाग सभेत प्रशासनाला धारेवर धरलेहोते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.महापालिकेचे सर्व कर भरूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही मग कर भरायचा की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण की शहरात सगळीकडे पाणीपुरवठा सुरळीत असताना फक्त आमच्या परिसरात कायम पाणीप्रश्न निर्माण होत आहे.- कल्पना माळवे, स्थानिक रहिवासी

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी