शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? ...तर दुबार पेरणीसाठी खतही मिळणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १८९. ० मि.मी. प्रत्यक्ष झालेला पाऊस - १२९.६ मि.मी. आतापर्यंत झालेली पेरणी -९७,०३७.५४ हेक्टर ...

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १८९. ० मि.मी.

प्रत्यक्ष झालेला पाऊस - १२९.६ मि.मी.

आतापर्यंत झालेली पेरणी -९७,०३७.५४ हेक्टर

२) कोणत्या तालुक्यात किती पाऊस/पेरणी

तालुका पाऊस (मि.मी.) पेरणी (हेक्टरमध्ये)

मालेगाव १२९.०० १५,६८४

बागला ९४.० १५,७४४.११

कळवण ६०.८ १४५९.०

नांदगाव १९३.६ १३,६१४.२०

देवळा ९८.३ ५६५१.००

सुरगाणा ७०.० २४६.००

नाशिक ८९.९ ७१३.००

त्र्यंबकेश्वर २५४.२ ४५.००

दिंडोरी ८९.९ ७५.००

इगतपुरी २८७.१ ९८.२३

पेठ १९६.४ ५८९.६०

निफाड १३७.१ ७८८.००

सिन्नर १०७.३ १०१८.९०

येवला १३३.७ ३३५४९.००

चांदवड १२३८.७ ७७८२.५०

चौकट-

मक्याचा पेरा वाढला

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याला पसंती दिली झाली असून पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ४७ हजार ३९५ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तर ७०९५ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. २०३१२.२० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय पिकांची पेरणी करण्यात आली आहे.

चौकट-

...तर दुबार पेरणी

पहिल्या एक-दोन पावसावर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या पण त्यानंतर संपूर्ण जून महिना कोरडा गेला. अधूनमधून काही भागात पोऊस झाला पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. अनेक शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहे. पण असंख्य शेतकऱ्यांना वरच्या पावसाचाच आधार आहे. जर येत्या पाच सहा दिवसांत पाऊस आला नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

चौकट-

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

कोट-

पहिला पाऊस जोरदार झाला त्यामुळे हुरूप आला. उत्साहाने मशागतीची कामेही पूर्ण केली पण त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेली पेरणी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अस्मानी संकटाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. - ज्ञानेश्वर तांबे, शेतकरी

कोट-

१५ -२० हजार रुपये खर्च करून मक्याची पेरणी केली. पेरणी करतानाच खादीच्या गोण्याही टाकल्या पण आता पावसाने दडी मारली आहे. मागील दोन तीन वर्षापासून हीच स्थिती असल्याने निसर्ग एका अर्थाने शेतकऱ्यांची परीक्षाच पहात आहे, असे म्हणावे लागेल. आता जर दुबार पेरणी करावी लागली तर भांडवल कोठून आणू? - बाळू दौंडे, शेतकरी

कोट-

जिल्ह्यात २७ ते २८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस आला नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांची रोपे उतरून पडली पण आता त्यांना पाणी नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. एका अर्थाने हे शेतकऱ्याचे नुकसानच आहे. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक