वाढीव वीलबिलविरोधात ""प्रहार"" आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:07+5:302020-12-04T04:40:07+5:30
करोना संकटात ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग न घेता सरसकट अंदाजे बिले धाडण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना काही हजारांमध्ये बिले आले ...
करोना संकटात ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग न घेता सरसकट अंदाजे बिले धाडण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना काही हजारांमध्ये बिले आले आहेत. याविषयी ग्राहकांमध्ये संशय असतानाही ग्राहकांचे समाधान करण्यात आलेले नाही. लाॅकडाऊननंतर ग्राहकांना सवलत दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र ऊर्जामंत्र्यांनी घूमजाव केले असून, वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा वीज महामंडळाकडून देण्यात आला आहे. सरकारने त्वरित ही वाढीव बिले मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, अमोल अडांगळे, श्याम गोसावी, किरण गोसावी, विकास जाधव, प्रमोद केदारे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो: प्रहार वीज अांदेालन)