शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात रस्त्यांची चाळण

By admin | Updated: July 24, 2014 00:56 IST

पावसाने झोडपले : भाताच्या आवणीला जोर; नद्या तुडुंब

पेठ : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पेठसह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी भाताची लावणी सुरू केली आहे, तर पहिल्याच पावसात तालुक्यातील रस्त्यांनी नांगी टाकली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे़
दोन महिन्यांपासून रुसून बसलेल्या पावसाने आषाढीलाही दर्शन न दाखवल्याने बळी राजाचे तोंडचे पाणी पळाले होते़ मात्र दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात पाऊस सक्रिय झाला असून, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर भात लावणी सुरू झाली आहे़ काही शेतकऱ्यांनी उशिराने रोपांची लागवण केल्याने आता शेतात पाणी आहे; परंतु रोप नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी दूरवरून रोप खरेदी करताना दिसून येत आहेत़
रस्त्यांची दुरवस्था
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांनी पहिल्याच पावसात नांगी टाकली असून, नाशिक-पेठ महामार्गासह तालुक्यातील इतर रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे़
करंजाळी ते पेठ हा साधारण बारा किमी अंतराचा रस्ता अतिशय धोकेदायक झाला असून, या रस्त्यावरील अपघांतामध्ये वाढ
झाली आहे़ सावळ घाट व कोटंबी घाटातील नव्यानेच तयार केलेली वळणे जैसे थे झाली आहेत़ कोटंबी घाटातील दरडी आ वासून राहिल्याने केव्हाही दरड कोसळून रस्ता बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)