शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

All India Marathi Sahitya Sammelan: “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 8:37 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

नाशिक: येथे सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप कार्यक्रमात निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाशिकचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantra Veer Savarkar) योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अजरामर आहे, असे पवारांनी स्पष्टपणे नमूद केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य अजरामर आहे. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर होत असलेल्या चर्चा चुकीच्या असून, अशा चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले. 

कुसुमाग्रज यांचे नाव दिले हे अगदी योग्य

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. ते अगदी योग्य आहे. अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. मराठी भाषा विषयक अडचणी समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचे ठरवले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, निवृत्ती न्या. नरेंद्र चपळगावकर बोलताना म्हणाले की, नाशिक म्हटलं की मला कवी गोविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज आठवतात. राज्य सरकार म्हणतेय की, दहावीपर्यंत मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ही घोषणा लवकरात लवकर अमलात आणली, तर खूप बरे होईल, अशी अपेक्षा न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, कुसुमाग्रजनगरीत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला चुकीचा आहे. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणे चुकीचे आहे. पण इथे घडणे आणखी चुकीचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक