शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

जूनअखेर गावागावात जलकुंभांचे होणार शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 2:50 PM

पेठ (रामदास शिंदे )- पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पेठ (रामदास शिंदे )- पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकिय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असून हातपंपाची दुरु स्ती व शुध्दीकरण या अभियानात करण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. टीसीएल पावडरची अपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाही बाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.-------------------------कोरडा दिवस पाळा...नागरिकांनी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाण्याचे साठे, भांडे रिकामे करून स्वच्छ धुऊन कडक ऊन्हात वाळविण्याचे आवाहन करप्यात आले आहे. तसेच सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनी भागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.------------------------------------साथीच्या आजारांवर उपाययोजनासद्या पावसाचे दिवस सुरू झाले असून केवळ दुषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार उद्भवतात. अशा वेळी प्रशासनावर मोठा ताण पडत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा संभव असतो. म्हणून पावसाळ्यापुर्वीच यावर उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याने.आगामी काळात साथीचे आजार रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येईल असे वाटते.

टॅग्स :Nashikनाशिक