शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य

By admin | Updated: November 18, 2016 00:48 IST

देवेंद्र फडणवीस : मनमाडला पालिका निवडणूक सभेत ग्वाही

मनमाड : शहरात २१ दिवासांनी पाणी येते दुर्दैवी गोष्ट आहे. जनतेला रोज पाणी देण्यासाठी योजना तयार आहे. तुमचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनमाड पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, अपूर्व हिरे, माजी आमदार संजय पवार, अद्वय हिरे, राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, जय फुलवानी, नारायण पवार, डाँ. आत्माराम कुंभारडे, थेट नगराध्यक्ष पदाचे मनमाड, येवला, नांदगाव येथील उमेदवार कुसुम दराडे, बंडू क्षीरसागर, संजय सानप उपस्थित होते.शहर भाजपच्या वतीने फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगतातून पाणी प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. निवडणुकीसाठी रिपाई बरोबर युती कारण्याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषनातून अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की २०१९ साला पर्यंत राज्यात एकही व्यक्ती कच्च्या घरात किंवा झोपडीत राहणार नाही. केंद्र व राज्य सरकार गोरगरीब जनतेसाठी सबसीडी देऊन निवाऱ्याचा प्रश्न सोडवत आहे. केवळ खुर्च्या तुडवण्याकरिता किंवा लाल दिव्याच्या गाड्या उडवण्यासाठी मी मुख्यमंत्री झालेलो नाही. जनतेची सेवा करण्याची संधी तुम्ही दिली मला दिली असून मुख्यसेवक म्हणून मी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.५०० व १००० रु पयांच्या नोटबंदी बाबत बोलताना ते म्हणाले की मेहनतीने पैसे कामावणाऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन एका रात्रीत नकली नोटांचा शिरच्छेद केला आहे. काळ्या पैशाच्या विरोधातील या लढाईमध्ये नागरिकांना ५० दिवसांचा त्रास सहन करावा लागणार आहे, तो सहन करावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यासाठी राज्य सरकारने योजना सुरु केली असून यातून सुशिक्षीत पिढी तयार होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.