शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:16 AM

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन २००९च्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी सेनेने स्वत:कडे दहा जागा ठेवून भाजपला पाचच जागा दिल्या होत्या. परंतु बदललेली राजकीय समीकरणे व दोन्ही पक्षांची वाढलेली ताकद पाहता भाजप सेनेकडून कमी जागेवर समाधान मानेल काय किंवा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची संख्या लक्षात घेता सेना आपल्या हक्काच्या जागा भाजपला सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सन २०१४ चा अपवाद वगळता राज्यात शिवसेना-भाजपची कायमच युती राहिली आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ असल्यामुळे साहजिकच सेनेच्या वाट्याला नेहमीच जादा जागा आल्या आहेत. जिल्ह्यात १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्यामुळे युतीच्या जागावाटपात सेनेला झुकते माप मिळत गेले. शिवसेना लढवित असलेल्या जागांपैकी निम्म्या जागांवर आजवर विजय मिळत आला आहे. सन २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर युतीच्या जागावाटपाचे सूत्रे बदलली. त्यावेळी सेनेने स्वत:कडे दहा जागा घेतल्या व पाच जागा भाजपसाठी सोडल्या होत्या. त्यात भाजप फक्त बागलाणची जागा जिंकू शकला, तर सेनेने चार जागांवर विजय मिळविला होता.सेना व भाजप दोन्ही पक्षांनी मतदारसंघाची व इच्छुकांचीही चाचपणी केली असून, ज्या जागांवर विद्यमान आमदार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम राहतील असे संकेत मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना राज्यातील निम्म्या जागांची मागणी करीत असून, तोच निकष नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांच्या जागा-वाटपाबाबत लावला, तर २००९च्या फॉर्म्युल्यानुसार भाजप पाच जागांवर समाधान मानेल काय, हाच खरा प्रश्न आहे. २००९ मध्ये भाजपने मालेगाव मध्य, बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी चांदवड, नाशिक पूर्व व पश्चिम या जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असे मानले जात आहे. मात्र या जागांव्यतिरिक्तआणखी जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यात प्रामुख्याने नांदगाव, कळवण, बागलाण या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. या तीन मतदारसंघापैकी गेल्या निवडणुकीत कळवण व बागलाण या दोन मतदारसंघात भाजप अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर होती. आता त्यात नांदगावची भर पडली आहे. गेल्या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, ती जागा सोडली तर सेना त्या बदल्यात नाशिक पश्चिम मतदारसंघाची मागणी करू शकते. मात्र कळवण व बागलाणच्या मोबदल्यात सेनेला कोणतेमतदारसंघ सुटतील याची उत्सुकता कायम आहे.भाजपची ताकद वाढल्याचा दावासन २०१४ मध्ये सेना व भाजप स्वतंत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांनी जिल्ह्यातील पंधराही जागांवर उमेदवार उभे केले त्यात भाजपला चार, तर सेनेलाही चार जागांवर विजय मिळाला. सेनेशी युती न करता स्वतंत्र लढल्यामुळे ताकद वाढल्याचा दावा भाजपच्या वतीने केला जात असला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याची व जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्या मतदारसंघातील जागावाटप कसे होणार याविषयी इच्छुकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा