शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या चुकीने सरपंचपद रिक्त

By admin | Updated: December 18, 2014 22:54 IST

काकडगाव : आदिवासी बांधवांमध्ये नाराजी

नामपूर : केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे काकडगावचे आदिवासी सरपंचपद रिक्त राहिले असून, यासंदर्भात संतप्त ग्रामस्थांनी तक्रारीचे निवेदन तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहे.निवडणूक आयोगाकडून सरपंचपद आदिवासी पुरुषाला राखीव होते. नियमाप्रमाणे वॉर्ड क्र. १ मधून या जागेसाठी गावकऱ्यांनी निंबा सोनवणे दाखल केला. स्थानिक स्वराज्य संस्था नियमाप्रमाणे शासनाने ५० टक्के महिला आरक्षण लागू केले आहे. याप्रमाणे काकडगावला ४ महिला ३ पुरुष सदस्य संख्या निवडणूक आयोगाने जाहीर केली. निवडणूक अधिकारी पंचायत कार्यालयात आल्यावर आदिवासी पुरुष सरपंचपदाबाबत माहिती विचारण्यासाठी गेल्यावर संबंधित अधिकारी एस. के. खरे यांनी गावचे सरपंचपद आदिवासी महिला प्रवर्गाला राखीव आहे. यामुळे पुरुषाला या जागेवर दावा करता येणार नाही, अशी माहिती दिली. यामुळे गावात एकच कल्होळ माजला, गावकऱ्यांनी विचारणा केली जर आमच्या गावात आदिवासी महिला सदस्य निवडूनच आली नाही तर सरपंचपदी फॉर्म भरायचा कोणाचा? यावर अधिकारी खरे यांची तारांबळ उडाली. गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम अहिरे, उपसरपंच नंदलाल अहिरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्याचे तहसीलदार पोतदार आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या अटीवर गावकरी ठाम राहिले. ७ सदस्यांपैकी ५ महिलांचे आरक्षण हा गावावर अन्याय आहे, आदिवासी महिला सदस्यात या पदापासून वंचित राहावे लागणार आहे, आदिवासी महिला निवडणूनच आली नाही तर सरपंच कोण होणार या सर्व प्रकाराला निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. खरे जबाबदार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होवून गुन्हा दाखल करून कार्यमुक्त करावे असा ठराव गावाने केला आहे. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या असून, गावातील सर्वच पुरुष, महिलांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)विशेष म्हणजे, सरपंच निवडणूक कामी जो अजेंडा दिला यावर तहसीलदारांच्या सह्या आहेत. यामुळे बागलाण तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक तलाठी, सर्कल यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सावळा गोंधळामुळे गावचे सरपंचपद रिक्त राहिले याचे दु:ख गावाला आहे. आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास सर्व आदिवासी बांधव तहसील कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा आदिवासी नेते आनंदा मोरे, विक्रम मोरे, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे यांनी दिला आहे.चौकट