शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

रोहित्र जळाल्याने निर्गुडपाडा, कोटमवाडी पुन्हा अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:57 PM

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र विजेच्या कमी-जास्त दाबाने पुन्हा जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही वेळ आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मात्र,महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवली आहे.

ठळक मुद्देनागरिक संतप्त : लोकप्रतिनिधींनीही फिरविली पाठ

निर्गुडपाडा व कोटमवाडी ही विद्युत रोहित्रच्या समस्येने दोन महिन्यापासून अंधारात होती.अनेक अडचणी व संकटाचा सामना केल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर महावितरण विभागाने या वाड्यांसाठी नवीन ४० के.व्ही.पॉवर असलेला विद्युत रोहित बसविला. थ्री फेज पुरवठा नसतानाही महिनाभर वेळ निभावली. परंतू, विद्युत रोहित्रावर अतिरिक्त ताण वाढल्याने विजेच्या कमी जास्त दाबामुळे विद्युत रोहित्र जळाले. त्यामुळे कोटमवाडी व निर्गुडपाडा ही दोन गावे चार ते पाच दिवसांपासून अंधारात असल्याने नागरिकांना विजेअभावी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेअभावी उपकरणे बंद असल्याने अनेक कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. एक ते दीड महिन्यांपासून थ्री फेज वीज वाहिनी मिळत नसल्याने पिठाची गिरणी बंद अवस्थेत असून येथील आदिवासी महिलांना दहा ते बारा किलोमीटर दळणासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच साप, विंचू यांसारख्या सरपटणा-या प्राण्यांपासून नागरिकांना धोका संभवतो. वारंवार येणा-या विजेच्या समस्येवर नागरिक नाराज असून महावितरणाच्या या वेळकाढूपणावर संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज