शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

By admin | Updated: April 6, 2015 00:40 IST

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

  नाशिक : ‘साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी टीका करणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनावरूनही महाराष्ट्र साहित्य परिषदेला टोला लगावला आहे. ‘हे पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरलाही घेतील’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. नाशकात एका कार्यक्रमात बोलताना जात-धर्म, इतिहास व भाषा यासंदर्भात विवेचन करताना एक धागा पकडून नेमाडे म्हणाले की, एका मराठी प्रजातीची दहा-बारा घरे काश्मीरला असून, त्यामुळे कदाचित पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरला घेतले जाईल. साहित्य परिषदांना मराठी माणसाचा नुसता वास आला, तरी तिथे संमेलने घेतात. जात-धर्माच्या व्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी धर्मनिरपेक्षवाद्यांवरही कडाडून टीका केली. हे लोक जातिअंताच्या गोष्टी करतात आणि स्वत: मात्र वरच्या जातीच्या मुलीशी लग्न करतात. म्हणजे जातीचा वेगळ्या अर्थाने अंतही होतो आणि बायकोही मनासारखी मिळते. जात-धर्माची व्यवस्था सरसकट वाईट म्हणणे चुकीचे असून, या रचनेत राहूनच सुधारणा करायला हव्यात, असे मतही त्यांनी मांडले.