शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कुंभनगरीत नमामि गोदावरीची उपेक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST

गोदावरीमुळेच नाशिकची कुंभनगरी ओळख आहे. मात्र, दरवेळी कुंभमेळ्यात गोदावरी नदीच्या शुध्दीकरणाविषयी चर्चा झडत असतात. त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणाऱ्या आणि पाच ...

गोदावरीमुळेच नाशिकची कुंभनगरी ओळख आहे. मात्र, दरवेळी कुंभमेळ्यात गोदावरी नदीच्या शुध्दीकरणाविषयी चर्चा झडत असतात.

त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणाऱ्या आणि पाच राज्यांना समृध्द करीत जाणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा नाशिकमध्ये तरी ऐरणीवर आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची आणि नाशिक महापालिकेचीदेखील आर्थिक मर्यादा तसेच विविध शासकीय यंत्रणांची गुंतागूंत बघता गोदावरी नदीसाठी स्वतंत्र प्राधीकरण हवे अशी मागणी जोर धरत आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर साबरमतीच्या धर्तीवर नाशिकचा विकासदेखील चर्चेत आला होता. प्रत्यक्षात निधीअभावी महापालिकेचे हात बांधले असल्याने हा विषय पुढे गेला नाही. आता महापौर सतीश कुलकर्णी आणि गोदावरी नदीबाबत संवेदनशील असलेल्या आयुक्त कैलास जाधव यांनी हा विषय केंद्र सरकारकडे नेण्याचे ठरवले आणि त्या आधारेच नमामि गंगेची संकल्पना मांडली.

नाशिक शहरातून ६७ नाले जातात. हे नाले खरे तर पावसाळ्यातच प्रवाही होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र, गटारी आणि सांडपाण्यामुळे हे नाले आठ महिने तर काही वेळा बारमाही वाहत असतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी या नाल्यांलगत स्वतंत्र मलवाहिका टाकून सांडपाणी किंवा मलजल थेट मलनिस्सारण केंद्रात नेता येण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर साबरमतीच्या धर्तीवर विकसीत करून गोदाकाठ संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहेे. त्यासाठी साधारणत: १८०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. अर्थात, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालात दर कमी अधिक होऊ शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत काही तरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याबाबत निराशा झाली आहे.

काेट...

नमामि गंगेच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रिवर आणि सिव्हर वेगळे करावे यासाठी केंद्र शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र,त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदींची घोषणा झालेली दिसत नाही. केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर