शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

महिलाराजला मिळणार संधी; तालुक्याचे लक्ष

By admin | Updated: January 5, 2017 23:26 IST

रस्सीखेच : बदललेल्या आरक्षणामुळे अनेकांची निराशा

 लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाडीवऱ्हे गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तालुक्यासह जिल्ह्यातही प्रभावी ठरण्याची शक्यता लक्षात घेता राजकीय पक्षांनी या गटाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या वाडीवऱ्हे गटासाठी अनुसूचित महिला आरक्षण पडल्यापासून अनेक मातब्बरांचा हिरमोड झाल्याचे बोलले जात असले, तरी आरक्षित जागेसाठी या गटात अनेक मातब्बर असल्याने उलट या गटातील राजकीय रंग वाढीस लागला असून, आजी-माजी आमदार, पंचायत समितीचे आजी-माजी सभापती यांच्या सहभागाने या गटात चांगलेच राजकीय रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. गतवेळी ओबीसी पुरुष आरक्षित या गटावर कै. गोपाळराव गुळवे यांचे सुपुत्र अ‍ॅड. संदीप गुळवे यांची वर्णी होती, तर वाडीवऱ्हे गणावर गोपाळा लहांगे व नांदगाव बुद्रुक गणावर वैशाली सहाने यांची. एकंदरीतच कॉँग्रेसने या गटावर आपली सत्ता कायम केली होती. कॉँग्रेसच्या वाडीवऱ्हे येथे झालेल्या गटनिहाय बैठकीत काँग्रेसकडून आमदार निर्मला गावित यांच्याच घरातील उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावर आमदार गावित यांनी मात्र कोणतेही भाष्य न करता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कै. गोपाळराव गुळवे यांचा बालेकिल्ला असलेल्या या गटात गुळवे समर्थकांचे वर्चस्व कायम राहिले आहे. त्या आधीच्या म्हणजेच २००७ च्या निवडणुकीत गटावर व नांदगाव बुद्रुक गणावर सेनेचीच सत्ता होती. वाडीवऱ्हे गणावर मात्र गत तीन पंचवार्षिकपासून काँग्रेसचीच सत्ता कायम राहिली. मात्र आताच्या राजकीय उलथापालथीने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व विद्यमान सभापती गोपाळ लहांगे हे २००७ चे जिल्हा परिषदेचे प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच पक्षात आल्याने त्यांनी सोयीने गट वाटून घेतल्याचे बोलले जात होते. मात्र सध्याच्या दिसणाऱ्या राजकीय वर्तुळात वेगळेच चित्र पाहावयास मिळत असून, वाडीवऱ्हे गटात शिवसेनेचा नेमका उमेदवार कोण, हा प्रश्न शिवसैनिकांनाही पडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस किंबहुना गोपाळराव गुळवेंनाच आपला पक्ष मानणारा हा गट राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिला आहे.
यापूर्वी सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सातत्याने राखीव असणारा वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट बदललेल्या फेरआरक्षणामुळे गत दहा वर्षांत दुसऱ्यांदा अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. पर्यायाने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्यासह अनेकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे या गटात आपले नशीब आजमवण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. या मतदारसंघात वाडीवऱ्हे व नांदगाव बुद्रुक हे पंचायत समितीचे गण आहेत. नवीन आरक्षणात वाडीवऱ्हे गण इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी, तर नांदगाव बु. गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. या गटात आता सर्वच राजकीय पक्षांचा वावर असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी रणधुमाळी उडणार आहे. गटात विरोधी समर्थकांनी अनेक मार्गांनी डावपेच आखले आहेत. गटातील मूलभूत गरजा, प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान, काही कामे प्रलंबित राहिली असली तरी अपेक्षा पूर्ण करू शकलो, असा दावा त्यांनी केला.