शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

सायगाव परिसरात खरीप हंगाम तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 6:54 PM

सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली तरी हाती कवडीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : उत्पादन खर्चाचा अन् बाजारभावाचा बसेना मेळ

सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली तरी हाती कवडीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.यंदा प्रत्येक नक्षत्रात कोसळणाऱ्या पावसाने प्रत्येक पिकाची धूळधाण केली. गाठीला असलेल्या लाल कांद्याचे बियाणे, रोपे वाया गेली.चढ्या दराने आणलेले विविध कंपन्यांचे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाच्या माºयाने निम्मी आर्धी कांदा रोपे सडली. या परिस्थितीतही संकटावर मात करत शेतकऱ्यांनी थोड्याफार लाल कांद्याची लागवडी केली. मात्र पावसाने संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. एकरी पंचवीस हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागले. रोजच्या पावसाच्या माºयाने मूग, भुईमूग, बाजरी काळी पडली आहे. परिणामी सात हजार रुपये दराने विकली जाणारी मूग दीड-दोन हजार दराने विकावी लागली. २१०० रुपयांचा हमीभाव असणारी बाजरी आठशे ते हजार रुपये दराने विकाी गेली. निम्म्या मालाचे शेतातच नुकसान झाले. बाजरी, मकाचा चारा खराब झाला. आता सायगाव परिसरात मका कापणीचा हंगाम सुरू आहे.रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी मातीमोल दरात शेतमाल विकत आहे. केवळ आठशे ते हजार रुपये दराने मक्याची विक्री करण्याची वेळ आली आहे. शेतमशागतीपासून ते बाजारापर्यंत मका पिकाचा एकरी उत्पादन खर्च ३० हजार रुपये झाला आहे. सरासरी उत्पादनही केवळ तीस क्विंटल पदरात पडत आहे. नदीकाठच्या जमिनी उपळल्याने तेथील पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. केवळ कपाशी पिकावरच शेतकºयांची सर्व भिस्त अवलंबून आहे. उन्हाळ कांदा बियाणांचा तुटवडा असल्याने रब्बी हंगामात पुन्हा कोणते पिके घ्यावे, हा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. (०४सायगाव)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी