शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा सडल्याने कोट्यवधीचे नुकसान

By admin | Updated: September 11, 2016 01:18 IST

नानासाहेब पाटील : केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र

लासलगाव : मागील वर्षी उन्हाळ कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने यंदा उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक पीक राज्यात घेण्यात आले. यामुळे कांद्याच्या भावावर संक्रांत येत मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेड व एसएफएसी या संस्थेअंतर्गत १५ हजार मेट्रिक टन कांदा महाराष्ट्रातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकऱ्यांसह नाफेडनेही कांदा चाळीत साठवून ठेवला. ४० लाख मेट्रिक टन कांद्यातून ०.-४५ टक्के कांदा घट व सडल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. मात्र हमीभाव तर सोडाच; अनुदानही अल्प म्हणजे ही शेतकऱ्यांची केंद्र व राज्य सरकारने एक प्रकारे थाटा केली आहेत यावरून केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणे-देणे नाही, असे दिसत असल्याचे मत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.मागील वर्षी दुष्काळ तोही भयानक होता. त्यातून कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्याने टॅँकरने पाणी आणत कांद्याला दिले मात्र झाले उलटे देशभरात कांद्याला कवडीमोल भाव मिळू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. त्याला मोदी सरकारने मदतीचा हात देत ४ मे २०१६ ला केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत घोषणा करत महाराष्ट्रातून १५ हजार मेट्रिक टन कांदा नाफेड व एसएफएसी या संस्थेमार्फत बाजार भावाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मुख्य लासलगाव, पिंपळगाव बसवंत व कळवण येथून साठवण क्षमतेनुसार नाफेडने पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला. नाफेडजवळ स्वत:ची दोन हजार ५०० मेट्रिक टन साठवण क्षमता आहे तर काही शेतकऱ्यांच्या चाळी भाड्याने घेत त्याठिकाणी कांदा खरेदी करत साठवला आहे. त्यातील ४० टक्के कांदा सडला आहे. एसएफएसी या संस्थेने किती कांदा घेतला आहे, त्याची काय परिस्थितीत आहे याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. उन्हाळ कांद्याची पाच ते सहा महिने टिकवण क्षमता असल्याने शेतकऱ्यांसह नाफेडने खरेदी केलेला कांदा साठवला मात्र झाले उलटे. बाजारभाव वाढले नाही त्यात नियमनमुक्त व अडत प्रश्नावरून एक महिना बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विक्रीसाठी आणलाच नाही. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा सडला आहे. काही कांदा शिल्लक आहे त्याला कोंब फुटले असून, त्याचा उग्रवास येत आहे. केंद्र सरकारने ज्या वेळी कांद्याचा तुटवडा निर्माण होईल आणि कांद्याचे दर गगनाला भिडतील. त्यादरम्यान हा कांदा बाजार आणून कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियंत्रण मिळविण्याचा विचाराने कांदा खरेदी केला; पण झाले उलटेच. कांद्याच्या वाढलेल्या उत्पादनामुळे सध्या बाजारात कांद्याचे दररोज भाव होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने प्रतिक्विंटल कांद्याला शंभर रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्याची माहिती बाजार समित्यांकडून घेतली जात आहे. मात्र नियमनमुक्त व अडत प्रश्नावरून एक महिना बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहिल्याने फक्त एकाच महिन्यात अल्पकांदा विक्री झाल्याने शेतकऱ्यांना या अनुदानाचा किती फायदा होणार यावरून लक्षात येते.