शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

भारत कधीही सहिष्णू नव्हता

By admin | Updated: December 15, 2015 23:40 IST

रावसाहेब कसबे : प्रबोधन परिषद

सटाणा : भारत कधीही सहिष्णू नव्हता. या देशात असहिष्णुतेचे वातावरण हे वैदिक काळापासून चालत आलेले आहे. केवळ बौद्ध काळात असहिष्णुता आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र सहिष्णुता पूर्णपणे प्रस्थापित झाली नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
समाजप्रबोधन संस्थेतर्फे सोमवारी येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित तिसऱ्या एकदिवसीय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. या परिषेदेत कसबे यांना कवी यशवंत मनोहर यांच्या हस्ते ‘प्रबोधन मित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कसबे यांनी नवोदित लेखकांना कोणत्याही व्यक्तीच्या आहारी न जाता स्वत:चे मत व्यक्त करण्याचा संदेश दिला. तसेच स्वत:चे आकलन, निष्कर्ष निर्भीडपणे मांडावे, पर्यावरण आणि त्याची गुंतागुंत जो चांगल्या पद्धतीने समजून घेईल त्यालाच उत्कृष्ट अशी साहित्य निर्मिती करता येईल असा कानमंत्रही त्यांनी नवख्या साहित्यिकांना दिला.
समाजप्रबोधन परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी जगातल्या धर्मपीठांनी मानवतेच्या विकसनात हातभार लावण्याऐवजी मोठे विघटन केले असल्याचे परखड मत मांडले. तसेच नव्या जगाचा धर्म ही कविता असेल असा आशावाद व्यक्त करताना डॉ. मनोहर म्हणाले, कसबे हे आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या साहित्याने आणि विचाराने एका पिढीचे प्रबोधन केले असून, त्यांनी अत्यंत खडतर वाटेवर चालत लेखनप्रवास केल्याचेही मनोहर यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाटककार दत्ता पाटील, डॉ. मिलिंद कसबे, बी. जी. वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी कवी किशोर पाठक, महेंद्र मेश्राम, शं. क. कापडणीस, अंबादास घालगोत, प्रशांत गरुड, रंगराज ढेगले, आरती बोराडे, तुषार शिल्लक, प्रमोद अहिरे, संजय दोबाडे, मिलिंद बनसोडे, शैलेश चव्हाण, मेघा पाटील, कचरू भालेराव आदि उपस्थित होते. परिषद आयोजनासाठी दादा खरे, डॉ. सिद्धार्थ जगताप, चंद्रकांत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)