शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला मुळ्याकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:33 IST

नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला

ठळक मुद्देबदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण

नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला समाधानकारक पडलेल्या पावसाने ऐन सुगीच्या दिवसात अतिवृष्टी सारखा पडल्याने पिकांचे नुकसान केले. या पावसात खरीपातील कांदा रोपांचे व लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सतत पडणाऱ्या पावसामुळे वारंवार रोपे व लागवड केलेले कांदे खराब झाले. पर्यायाने कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. हजार रूपये किलोने मिळणारे कांदा बियाणे पाच हजारांपर्यत पोहचले. या भावातही अनेक शेतकऱ्यांनी रोपे तयार केली, तर काहींनी महागडी रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड केली. मात्र उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा परतीच्या रुपाने सतत हजेरी लावत कांद्याचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या बाजारात कांद्याला मिळत असलेला भाव व सध्याची अल्प लागवड लक्षात घेता आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार असे चित्र लक्षात घेऊन नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी बीड, अहमदनगर, पुणे व जळगाव आदी ठिकाणाहून महागात रोपे विकत आणून कांद्याची लागवड केली. तर काहींनी चक्क चार हजार रूपये किलोने बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली. मात्र यातही सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण झाले आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याला पर्याय म्हणून मुळ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी