शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 6:32 PM

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घटना : राजापुरात आठवडाभरात जाधव कुटुंबावर आघात

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.राजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण माधवराव जाधव यांच्या आई मालनबाई माधवराव जाधव या आजारी असल्याने त्यांच्या दोन बहिणी मुंबई येथून आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आल्या होत्या. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या कुटुंबात एकेकाला त्रास जाणवायला सुरुवात झाली. तेथून नियतीचा खेळ सुरू झाला आणि सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील स्वतः अरुण जाधव, मुलगा अमित जाधव, आई मालनबाई जाधव आणि अरुण जाधव यांच्या दोन बहिणी शोभा सातदिवे व छाया वाघ यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील पाच सदस्य इहलोक सोडून गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मागील वर्षीच अरुण जाधव त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या दुःखातुन सावरत नाही तोच एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याची घटना घडली. या घटनेने राजापूर गाव सुन्न आणि नि:शब्द झाले आहे.दिव्यांग मुलाच्या भवितव्याचा प्रश्नजाधव यांना एक मतिमंद मुलगा असून, या दुर्दैवी घटनेमुळे या मुलाचा संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुण जाधव यांच्या कुटुंबातील कर्ता मुलगा अमित जाधव हाच एकमेव या कुटुंबाचा आधार होता. मात्र नियतीने अमितच्याही पत्नी व मुलाच्या भवितव्याचा प्रश्न उभा केला आहे. अमित यास पत्नी व लहान मुलगा असून, त्याचा दिव्यांग असलेल्या लहान भावाचीही जबाबदारी तो सांभाळत होता. या घटनेने राजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल