शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

देश सैनिकांच्या पाठीशी

By admin | Updated: October 28, 2016 00:03 IST

देवेंद्र फडणवीस : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

वडांगळी : सीमेवर अहोरात्र जागून देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रावसाहेब दानवे, मुंबई जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, आमदार सुनील राऊत आदि मान्यवर उपस्थित होते. मुंबई येथील सहकारमहर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एकटे पडू देणार नाही. देश भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा असून, त्यांना काही मदत लागल्यास निसंकोचपणे सांगण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी सहकारमंत्री देशमुख, सहकार राज्यमंत्री पाटील, आमदार दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने महाराष्ट्रातील चार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर मुंबई को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)