शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

एकलहरेत दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:48 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच अर्थ नसल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, एकलहरे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीत ज्या अडचणी आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने रतन इंडिया कंपनीसाठीही अधिक अडचणींचा डोंगर असल्यामुळे तोंड पोळलेल्या महानिर्मितीकडून अशा प्रकारचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच अर्थ नसल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, एकलहरे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीत ज्या अडचणी आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने रतन इंडिया कंपनीसाठीही अधिक अडचणींचा डोंगर असल्यामुळे तोंड पोळलेल्या महानिर्मितीकडून अशा प्रकारचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  महानिर्मितीला कोळसा टंचाईचे ग्रहण नवीन नाही. त्यामुळे सध्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. केंद्राला दररोज सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी संच ३ व ४ सुरळीत सुरू आहेत, तर एक संच स्टँडबाय ठेवलेला असतो. सध्या दोन्ही संचांमधून १९०-१९५ मेगावॉट वीज उत्पादन सुरू आहे. केंद्राला लागणाऱ्या कोळशाबाबत शेड्यूल ठरविण्यात आलेले असून, दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्यास पुढच्या दोन दिवसांसाठी लागणारा कोळसा वाहतुकीत आॅन द वे असतो. त्यामुळे केंद्राला वेळेत कोळशाचा पुरवठा होईल असे व्यवस्थापनाचे म्हणणे असले तरी, एकलहरेच्या एका संचाचा कोळसा पुरविण्याचा ठेका घेतलेल्या धारिवाल कंपनीचा करार आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आला असून, त्यामुळे नवीन करार केला किंवा नाही याचा उलगडा होत नाही. तथापि, देशातील प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राची वाटचाल एकलहरे केंद्राच्या बरोबरीने आजवर झालेली असल्याने त्यात नवीन काहीच नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत एकलहरे बंद करून त्या ऐवजी रतन इंडियाचा वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी सुरू झालेल्या चर्चेतही फारसे तथ्य नसल्याचे जाणवत आहे. एकलहरे प्रमाणेच रतन इंडियाचा प्रकल्प असून, या प्रकल्पाला कोळसा वाहतुकीची साधने नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.  तसेच शासन त्यांच्याकडून वीज विकत घेईलच, याची कोणतीच शाश्वती नाही. कोळशाप्रमाणेच दळणवळण, रस्ता, पाणी व विजेची मागणी करणारे उद्योग याची रतन इंडियाला मोठी गरज आहे. आजच्या घडीला रतन इंडियासमोर ह्याच मोठ्या अडचणी उभ्या असून, त्या सोडविल्या जातील याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत सेट झालेला एकलहरेचा प्रकल्प बंद करून त्याऐवजी रतन इंडियाच्या पाठीमागे महानिर्मिती धावेल यावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे एकलहरेच्या प्रकल्पाबाबत कर्मचाºयांच्या मनात भीती घालविण्याबरोबरच रतन इंडियाच्या प्रकल्पात खीळ घालण्यामागे राजकारण असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.संचाची दुरुस्ती केल्यास खर्च कमी होईलएकलहरे केंद्रात सध्या आहे त्या संचांची दुरुस्ती व अद्ययावतीकरण केल्यास संचाचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढेल व रतन इंडियापेक्षा खर्चही कमी होईल. दरम्यानच्या काळात नवीन ६६० चा प्रकल्प किंवा २५० चे तीन संच एकलहरेसाठी द्यावेत अशी कर्मचाºयांची मागणी असून, तसे झाल्यास वीजनिर्मितीची उत्पादन क्षमता वाढीस लागून खर्चातही कपात होण्याचा दावा केला जात आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक