शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

बालकांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:11 AM

नाशिक : ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून आकाशाला गवसणी घातली आहे. अनेक माध्यमांतून आणि अभ्यासातून मुलांनी स्वत:ला सिद्ध करताना आपली आणि आपल्या शाळा, महाविद्यालयांचा लौकिकदेखील वाढविला आहे. देशाचे भवितव्य म्हणून मुलांकडे पाहिले जात असल्याने त्यांच्याकडून अशा कामगिरीचेही कौतुक होणे अपेक्षित आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रत्यक्षात साकारलेल्या संशोधनातून या मुलांनी स्वत:च्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यांच्या या भरारीची घेतलेली दखल...

नाशिक : शहरातील बाल संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात गगनभरारी घेत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या समस्या आणि आव्हानांचा विचार करून २५० ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाचे ड्रोन तयार करून भारतातील अव्वल ३० प्रकल्पांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील विद्यार्थी रोशन शिलावट, यशपाल गुप्ता आणि रोहित माळोदे यांनी ‘माध्यम आणि करमणूक’ या विषयांतर्गत ‘डिसेंट वर्क अ‍ॅण्ड इकोनोमिक ग्रोथ’ तर दिया गुजराथी, अमृता जाधव आणि मोक्षदा चिरमाडे या विद्यार्थिनींनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर ड्रोन तयार करून राष्ट्रीय स्तरावर ‘ड्रोन चलेंज’मध्ये सहभाग नोंदवत अडीचेशे ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजनाच्या ड्रोनचे सादरीकरण करण्यात यश मिळविले. या प्रकल्पातील ‘अ‍ॅडव्हानसिंग इंडिया विथ ड्रोन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’साठी पारितोषिक मिळाले आहे.असून, भारतातील अव्वल ३० प्रोजेक्टमध्ये त्याची निवड झाली आहे.ड्रोनचे कार्यविद्यार्थ्यांनी केलेला ड्रोन सुमारे २५० ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा असून, त्याचा वापर ‘सुरक्षा व्यवस्थापन’, तसेच आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जीवनावश्यक ‘वस्तू वितरण’ यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून ‘नावीन्यपूर्णत: व प्रकल्पाचे सामाजिक परिणाम यासोबत येणाऱ्या समस्यांची ओळख यासोबतच सादरीकरण कौशल्ये आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूपतेवर’ आधारित या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षक प्रतीक गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Studentविद्यार्थीscienceविज्ञान