शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 02:07 IST

नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे.

ठळक मुद्देजागावाटपावर युतीचे भवितव्य, आघाडीतही फेरबदल शक्य

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेनेत इच्छुकांची असलेली संख्या व उमेदवारीसाठी असलेली रस्सीखेच पाहता, पक्षांतर्ग$त पातळीवर उमेदवारी वाटपावरून राजी-नाराजी निर्माण होवून त्यातून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार असल्या तरी बोटावर मोजण्याइतके मतदारसंघ वगळता यशाची पूर्ण खात्री देता येत नाही. सर्वांचे लक्ष लागले आहे ते येवला मतदारसंघाकडे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मतदारसंघात शिवसेनेने चालविलेली तयारी पाहता यंदा भुजबळ मतदारसंघ राखतील काय, हाच खरा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी, सत्ताधारी भाजपा, सेनेच्या युतीबाबत अद्याप अनिश्चितता असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. युती होणार काय आणि जिल्ह्यातील कोणत्या जागा सुटणार हे जाहीर झालेले नसल्यामुळे दोन्ही पक्षांत जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी केली जात आहे. सध्या भाजप, सेनेच्या ताब्यात प्रत्येकी चार मतदारसंघ असून, राष्टÑवादीच्या चार व कॉँग्रेसच्या ताब्यात दोन मतदारसंघ आहेत. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडे एक जागा आहे. दिंडोरी मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी सेनेत प्रवेश केला असून, या मतदारसंघातून अनेक इच्छुक असल्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार व त्याचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता आहे. देवळामधून भाजपला शह देण्यासाठी चांदवडचा एकच उमेदवार देण्याचे घाटत असल्याने तेथे चुरशीची स्पर्धा होईल. नांदगावमध्ये भुजबळपुत्र पंकज यांच्यापुढे यंदा कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमने तयारी चालविली असून, तेथे कॉँग्रेसशी लढत होईल. बागलाणमध्ये राष्टÑवादीविरुद्ध भाजपात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. पश्चिम मतदारसंघासाठी सेनेने दबाव वाढविला आहे. तर भाजपनेही नांदगावसाठी सेनेवर दबाव ठेवला आहे. मनसेने रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र आहे. वंचित आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी असल्यामुळे काही मतदारसंघात तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहे.
पालकमंत्र्यांचीही
प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची व त्यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी आहे. महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेतही भाजप सत्तेत सहभागी होऊ शकली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाजन यांचे नेतृत्व पुन्हा कामी येते काय हे पहावे लागेल.
तुषार शेवाळे यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. तुषार शेवाळे यांची कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आधीच सत्ता हाती नसल्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ व त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या पाहता, अशा परिस्थितीत कॉँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शेवाळे यांची कसोटी लागेल.
‘वंचित’चे काय
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार हवा निर्माण केली होती. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत वंचितने लाखापेक्षा अधिक मते घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित उमेदवार उभे करणार असली तरी, किती जागा लढविणार याविषयी अनिश्चितता आहे. मतदारसंघ व उमेदवारांचा शोध सुरू आहे.
मनसे फॅक्टर?
निवडणुकीची घोषणा होताच मनसेने जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढण्याची घोषणा केली आहे. २००९ मध्ये नाशकातील तीन जागा मिळविलेल्या या पक्षात नंतर मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्यामुळे हा फॅक्टर लक्षवेधी ठरू शकेल.
महाले, चारोस्कर, गावितांचे काय होणार
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्टÑवादीत गेले व पराभव होताच स्वगृही परतले, तर भाजपाकडे झुकलेले काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर हे शेवटच्या क्षणी शिवबंधनात अडकले. दोन्ही माजी आमदारांची दावेदारी पाहता, दिंडोरीत नेमके काय होईल याविषयी उत्सुकता आहे. तसाच काहीसा प्रकार इगतपुरी मतदारसंघाच्या बाबतीत आहे. दोन वेळा कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या निर्मला गावित यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या तिन्ही आजी-माजी आमदारांची कसोटी लागणार आहे. ते विधीमंडळाची पायरी चढतात की, मतदार वेगळा कौल देतात, हे औत्सुक्याचे ठरले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे