शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पाठयपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:43 IST

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.

ठळक मुद्देमानोरी : शाळेतील डिजीटल बदलाने पटसंख्या वाढण्याची शिक्षकांना अपेक्षा

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.यात प्रामुख्याने मागील पंधरा दिवसापासून इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या शाळा प्रवेश बाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यंदा मात्र दुष्काळ परिस्थितीमुळे सर्व सामान्य शेतकरी आपल्या पाल्याला इंग्रजी की मराठी पैकी कोणत्या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा? अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळे प्रमाणे मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळेने देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा डिजीटल शाळा झाल्या आहेत. संगणकीय प्रणालीवर इयत्ता पहिली पासून शिक्षण देण्यास सुरुवात देखील झाली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आनंदमय जाण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रि या ही शून्य खर्चावर दिली जाणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पलिी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नि:शुल्क दरात मोफत प्रवेश, मोफत पाठयपुस्तके, मोफत २ गणवेश दिले जाणार आहेत.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आली असून मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामिगरी झाल्याने गावातील पालकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेविषयी आपुलकी वाढत चालली आहे. गतवर्षी पासून अनेक विविध प्रकारच्या उपक्र मातून नाविन्यपूर्ण शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्र मामुळे पटसंख्या वाढत चालली आहे.ग्रामपंचायतच्या १४ वित्त आयोगातून प्राथमिक शाळेसाठी डिजीटल वर्ग आणि रंगरंगोटी कामासाठी निधीची तरतूद केल्याने दोन वर्षात शाळेचा कायापालट झाला असून शाळेच्या कोऱ्या भिंती रंगरंगोटीने जणू बोलक्या झाल्या आहेत. तसेच दोन संगणक संचच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.शाळेची इमारत ही गावातील मुख्य रस्त्या लगत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. चालू वर्षी तार कंपाउंड काम देखील जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणून एकाच वर्षात शाळेची पटसंख्या दुपटीवर येऊन पोहोचली आहे.