शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निवडणूक तयारीत भाजप-राष्टÑवादी पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:55 IST

विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेस, शिवसेनेत स्वस्थताचमनसेकडून इच्छुकांची चाचपणी

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी नाशकात येऊन चाचपणी केली असली तरी, शिवसेना व कॉँग्रेसमध्ये सामसूम असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हायकमांडच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून, पक्षांबरोबरच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांनी तयारी चालविली आहे. एकेका मतदारसंघात दोनपेक्षा अधिक इच्छुक असून, विशेष करून सत्ताधारी भाजप व शिवसेनेत इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या इच्छुकांना पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल अशी ठाम खात्री असल्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्यांनी आपल्या पातळीवर प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला जात आहे. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्याबरोबरच गॉडफादरकरवी उमेदवारीसाठी फिल्ंिडगही लावली जात आहे. सर्वच पक्षांनी अशा इच्छुकांना हवा देऊन वातावरण तापविण्यास अप्रत्यक्ष हातभारच लावला.केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेत मात्र स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या दृष्टीने काही तयारी दिसली नाही. मध्यंतरी उत्तर महाराष्टÑाचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस दौºयावर येऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व काही लोकार्पणे केली; परंतु शिवसेनेत सर्व निर्णय ठाकरे कुटुंबीयांकडूनच घेतले जात असल्यामुळे निवडणुकीपूर्वी नाशिक दौरा करून त्यांच्याकडून आढावा घेतला जाण्याची अपेक्षा होती. तसे झालेले नाही. इच्छुकांनी मातोश्री दरबारी हजेरी लावून आपल्या इच्छा प्रदर्शित केल्या असल्या तरी, जोपर्यंत भाजपबरोबर युतीचा फैसला होत नाही तोपर्यंत शिवसेनेत शांतता राहील, असे सूत्रांनी सांगितले.वंचित, एमआयएम संभ्रमातविधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएम स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या दोन्ही पक्षांची नाशिक जिल्ह्यातील तयारी काहीशी संपुष्टात आली आहे. जिल्ह्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी दावा सांगून निवडणुकीची चाचपणी केली होती. त्यासाठी मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकाºयांनी नाशकात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चाही केली. एमआयएमनेही स्वतंत्रपणे चाचपणी केली; परंतु या दोन्ही पक्षांनी सक्षम उमेदवाराच्या शोधासाठी ‘थांबा व वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.१ चालू आठवड्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधूनच आपल्या राज्य दौºयाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी नाशकात मुक्काम ठोकून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची चाचपणी व इच्छुकांचे मत अजमावणी केली. पवार यांची पाठ फिरताच, भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचे नाशकात आगमन झाले.२ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवस नाशकात तळ ठोकत निवडणूक पूर्वतयारी केली. प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाचारण करून भाजपने नारळही फोडून घेतला. अन्य पक्षांमध्ये मात्र अद्यापही शांतता आहे. नाही म्हणायला गेल्या महिन्यात कॉँग्रेसच्या निवडणूक समितीच्या पदाधिकाºयांनी नाशकात येऊन जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या व लवकरच यादी जाहीर करू, असे आश्वासन दिले.कॉँग्रेसचे इच्छुकमात्र अजूनही यादीची प्रतीक्षा करीत आहेत. तर मनसेच्यावतीने गेल्या महिन्यात व शनिवारीही पदाधिकाºयांनी नाशकात येऊन उमेदवारांची चाचपणी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेShiv Senaशिवसेना