शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच : जायकवाडीला ४० टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी ...

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठापाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ७० ते ८५ टक्केइतके पाणी साठले आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून धरणांमध्ये त्याच्या साठवण क्षमतेइतके पाणी साठविण्याचे नियोजन असले तरी, काही विशिष्ट प्रमाणात धरणांमध्ये पाण्यासाठी जागा शिल्लक ठेवावी लागत असल्याने जिल्ह्यातील दारणा, पालखे, कडवा, भोजापूर, आळंदी या पाच धरणांमधून गेल्या दहा दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठा झाल्यामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला, परंतु गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. दारणा धरणात ९१ टक्के इतके पाणीसाठा असून, धरणाच्या वरच्या बाजूला इगतपुरी तालुक्यात अधूनमधून पावसाची हजेरी कायम असल्यामुळे दारणा धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने सुमारे १८०० क्यूसेक पाण्याचा दररोज विसर्ग केला जात आहे. १५२० क्यूसेक पाणी पालखेड धरणातून सोडले जात आहे. आळंदी, कडवा, भोजापूर यांची साठवण क्षमता कमी असली तरी, ते धरणे काठोकाठ भरल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यावाचून पर्यायच नाही.