कनाशी : कळवण तालुक्यातील दळवट येथे दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तामडी नदीवर आलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याने त्यात ८० ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना घडली.दळवट येथे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिक दळवट येथील तामडी नदीवर गेले होते. यातील पुरुष व महिलांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. त्यात ८० ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}