शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वच मनपा इमारतींचे ऑडिट : सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग लागली. राज्यातील महापालिका आणि नगरपालिका इमारतींचे फायर ऑडिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे ...

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या इमारतीला आग लागली. राज्यातील महापालिका आणि नगरपालिका इमारतींचे फायर ऑडिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. नाशिक महापालिकेत आग लागण्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. - उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

कोट..

महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आणि दुसरीकडे ही घटना घडली. या इमारतीचे फायर ऑडिट झाले आहे. तरीही आग लागणे आश्चर्यकारक असले तरी शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

- देवयानी फरांदे, आमदार

कोट...

महापालिकेत आगीची दुर्घटना घडली असली तरी आग वेळीच आटाेक्यात आल्याने अडचण नाही; मात्र आग का लागली, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने समिती नियुक्त केली आहे. त्यात आग नक्की कशामुळे लागली, हे स्पष्ट हेाईल. त्यातून आवश्यक त्या उपाययोजना राजीव गांधी भवन आणि अन्य इमारतींत करण्यात येतील.

- सतीश कुलकर्णी, महापौर

....कोट..

आग वेळीच आटोक्यात आली हे खरे असले तरी यानिमित्ताने महापालिकेचे फायर ऑडिट हे कागदोपत्री नव्हते ना, असा प्रश्न निर्माण होतो. केवळ हाच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिका वास्तूंमध्येदेखील फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची आणि तपासण्याची गरज आहे.

- अजय बेारस्ते, विरोधी पक्ष नेता, महापालिका

....इन्फो....

महापालिकेच्या मुख्यालयात आग लागल्याचे कळल्यानंतर इमारतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची येथे गर्दी झाली. मात्र, अग्निशमन दलाने कर्मचाऱ्यांना त्या भागातून अन्यत्र पाठवल्याने गर्दी टळली.

इन्फो...

अन्यथा, मोठी दुर्घटना घडली असती

महापालिकेच्या इमारतीत सकाळपासूनच गर्दी असते. सुमारे चारशे ते पाचशे अधिकारी कर्मचारी या इमारतीत असतात. अनेकदा नागरिकांना प्रवेश नसला तरी ठेकेदार, राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक यांचाही सकाळपासूनच राबता असतो. मात्र, सकाळी अशा प्रसंगात तत्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत न होता सर्व सोपस्कार पार पडले. विशेष म्हणजे पेस्ट कंट्रोलमुळे अगाेदरच कर्मचारी बाहेर काढल्यामुळे सर्वच बचावले.