शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रांतरगृह : पालकमंत्र्यांचे घुमजाव

By admin | Updated: January 16, 2015 23:26 IST

संदिग्धता कायम : प्रत्यक्ष पाहणी करून घेणार निर्णय

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून रामकुंडानजीकचे वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश देणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घुमजाव केले असून, सदरची वास्तु मोठी व धार्मिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे सांगण्यात आल्याने ती पाडण्याबाबत अगोदर पाहणी केली जाईल व मगच निर्णय घेतला जाईल, असे सांगून याबाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात साधु-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी हा विषय उपस्थित केला असता, महंत ग्यानदास यांनी वस्त्रांतरगृहाच्या इमारतीमुळे शाहीस्नानासाठी साधुंना अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले होते. या वस्त्रांतरगृहामुळे आपण पाण्यात बुडता बुडता वाचलो अशी पृष्टी जोडून त्यांनीही वस्त्रांतरगृह तत्काळ काढून टाका अशी सूचना केली, तर फरांदे यांनी वस्त्रांतरगृहामुळे रामकुंडावर सूर्यप्रकाश पडत नाही त्याचबरोबर गोदावरी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यातही अडचणी येत असल्याचे सांगितले होते. या सूचनांचा आधार घेत पालकमंत्री महाजन यांनी वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले होते. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी रामकुंडावर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहित संघाने वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोध दर्शवून महंत ग्यानदास यांची भेट घेतली व त्यांची मनधरणी केली, तर पालकमंत्री महाजन यांच्याकडेही विरोध प्रकट केला होता. वस्त्रांतरगृहाबाबत परस्परविरोधी भूमिका सुरू झाल्याने महाजन यांनी आमदार बाळासाहेब सानप यांना संबंधितांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी वस्त्रांतरगृहाची वास्तू ही शासनाच्या निधीतून उभारण्यात आली असून, ती बरीच मोठी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. या वास्तुचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचेही लक्षात आणून देण्यात आले. वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याच्या सूचना आपण केल्या असल्या तरी, त्यावेळी ही वास्तु इतकी मोठी व शासननिर्मित असेल याची कल्पना नव्हती. आता मात्र आपण स्वत:च या वास्तुला भेट देऊन त्याची उपलब्धता व गरज तपासून पाहणार असून, त्यानंतरच ती पाडायची की, राहू द्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी बदललेल्या या भूमिकेमुळे वस्त्रांतरगृहाला अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)