शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी कृषी अधिकारी धावले मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 4:17 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

ठळक मुद्देलखमापूर परिसरात बियाणे खराब निघाल्याने शेतकरी नाराज

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने सोयाबीन पिक हे अतिशय महत्वाचे मानले जाते. परंतु काही शेतकरी वर्गाने आपल्या घरातील जुने सोयाबीन बियाणे व काही ठिकाणीहुन नवीन बियाने खरेदी केल्याने त्याची उगवण क्षमता न तपासणी केल्यामुळे सोयाबीन उगवणीवर त्यांचा परिणाम होतांना दिसत आहे.सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी आता दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सोयाबीन पिक उत्पन्न वाढीसाठी बळीराजांला मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे. सोयाबीन पेरणी करतांना शेतकरी वर्गाने योग्य नियोजन करून पेरणी करावी. त्यासाठी शेतकरी वर्गाने अगोदर जमिनीतील ओलीचे प्रमाण कसे आहे. याची पडताळणी करणे गरजेचे आहे. कारण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. शेतीत जर ओल अत्यंत कमी असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक जोमाने येणार नाही. साधारणपणे शेकडा ६० ते ७० टक्के जर जमिनीत ओल असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक घेण्यास उत्तम राहाते.परंतु जमिनीत शेकडा २० ते २५ टक्के ओल सोयाबीन पिकास हानीकारक राहाते. या सर्व गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच सोयाबीन पिक शेतकरी वर्गाला चांगले घेता येईल.सोयाबीन पिक शेतकरी वर्गासाठी सोनेरी पिक मानले जाते. हे पिक उगवण झाल्यानंतर त्याची जोपसना हाही एक महत्वाचा भाग मानला जातो. या पिकावर साधारणपणे नागआळी, गोगलगाय, लष्करी आळी, तुडतुडे याचा लवकर प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी वर्गाने निबोळी अर्कचा जर वापर केला तर पिकावरील कोणत्याही प्रकारचे रोग, वेगवेगळ्या आळीचे आक्र मण यापासून संरक्षण मिळते. असे ही तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.प्रतिक्रि या...शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेताना अगोदर जमिनीतील माती परिक्षण, प्रतवारी, ओलावा यांचे योग्य नियोजन करून मगच पेरणी करावी. त्यामुळे उत्पन्नाची टक्केवारी वाढण्यासाठी शेतकरी वर्गाला चांगली मिळते.- अभिजीत जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका. (फोटो ३० सोयाबीन)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी