शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-मंदाणे राज्यमहामार्गाचे काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, ...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, बोरद, तऱ्हाडी, परिवर्धा, शहादा, मंदाणे, शहाणे, मालकातर, बोराडी सांगवी व पुढे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पुढे हातेड ते अमळनेर, पारोळा, भडगाव असा मोठ्या लांबीचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा राज्यमार्गाचा दर्जा ठरलेल्या या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. केंद्र सरकारकडे खासदार डॉ.हीना गावीत यांनी पाठपुरावा करून एनईटी अंतर्गत या महामार्गाचे काम मंजूर करून घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचे नियंत्रण असून शहादा बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कलमाडी ते वेळावदपासून शहादा, मंदाणे, शहाणा, मालकातरपर्यंत सुमारे ५५ किलोमीटर रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर पूल व पाईपमोऱ्या नव्याने करण्यात येत आहेत. तसेच या मार्गावरील गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला भुयारी गटारी करण्याचे काम सुरू आहे. डोंगरगाव व पिंपर्डे याठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. हा मार्ग मध्य प्रदेश राज्याला जोडणारा असून सारंगखेडाकडून व नंदुरबार, शहादाकडून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीचा तसेच वेळ व इंधन वाचवणारा ठरणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वाहतूक वाढणार

हा राज्य मार्ग शहादा-मंदाणे व पुढे वडगाव-बोराडीकडे जात असला तरी मंदाणेमार्गे जावदा-भामरटानाकाकडे जाणारी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंदाणे-जावदा रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे आवश्यक आहे. गुजरात राज्याकडून तसेच दोंडाईचा, नंदुरबार, साक्रीकडून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी हाच मार्ग सोयीचे ठरणार असल्याने आतापासूनच वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

विकासाला हातभार

शहादा-मंदाणे महामार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना वाढत्या वाहतुकीमुळे चांगला फायद्याचा ठरणार आहे. उपहारगृह, चहाची दुकाने, वाहन गॅरेज अन्य दुकाने थाटण्याचे नियोजन बेरोजगार तरुण करीत असल्याने मंदाणे भागातील विकासला चालना मिळणार आहे.

मंदाणे येथे पुलाचे नव्याने काम व्हावे

मंदाणे येथील नदीवरील मोठ्या पुलाच्या कामास तब्बल २५ वर्षे झाली असून या पुलावरील दोन्ही बाजूकडील लोखंडी सळ्या निघून गेल्या पूल कमकुवत बनत चालला आहे. आजूबाजूचे संरक्षक कठडे निघत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक वाढल्यास हा पूल जास्त काळ टिकेल असे वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. सध्या महामार्गाचे काम सुरू असून याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.