शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर विखुरलेले पांढरं सोनं देतेय अनेकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे पीक. पण वाहतुकी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस हे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे पीक. पण वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पडलेले हेच पांढरं सोनं अनेकांना रोजगाराचे साधन बनले आहे.खान्देशात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेजारील गुजरात राज्यात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग जास्त असल्याने खान्देशात उत्पादीत होणाºया कापसाला गुजरात राज्यात मोठी मागणी आहे. खान्देशातील धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस अनेक व्यापारी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गाने गुजरातमध्ये वाहतूक करतात. वाहतुकीच्या दरम्यान रस्त्याची दुरवस्था हवेचा दाब, वाहनांचा वेग व अन्य कारणांमुळे वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सैल होते. त्यामुळे वाहनातून काही प्रमाणात कापूस रस्त्यावर पडत जातो. दिवसभर कापसाने भरलेली शेकडो वाहने या रत्यावर धावतात. त्यामुळे थोडा-थोडा करून बराच कापूस रस्त्यावर व रस्त्यालगत पडतो. रात्री अनेक वाहनात भरलेल्या कापसाची बांधणी सुटली तर अंधारात हा प्रकार वाहन चालक व सहचलकाच्या लक्षात येत नसल्याने अनेक वाहनांतून मोठ्या प्रमाणात कापूस खाली पडतो. रस्त्यावर पडलेला हा कापूस अनेकांच्या नजरेत भरत नसला तरी अंकलेश्वर-बºहाणपूर राज्यमार्गावर वसलेल्या गावातील काही जणांनी या कापसाला आपल्या रोजगाराचे साधन बनवले आहे. रस्त्यावर विखुरलेला हा कापूस गोळा करून त्याला स्वच्छ करून त्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न घेतले जात आहे.तळोदापासून ते खापरपर्यंत सकाळच्या सत्रात सहा ते नऊ वाजेदरम्यान काही जण हा कापूस वेचताना रस्त्यालगत दिसतात. त्यांच्याशी संवाद साधला असता दिवसाला पाच ते सहा किलो कापूस अवघ्या आठ ते दहा किलोमीटर परिसरात सहज गोळा होत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावर पडलेल्या या कापसाला चिटकलेली धूळ, माती व कचरा वेगळे करण्यात येते. नंतर या कापसाला एक-दोन दिवस उन्हात वाळवून त्याची बाजारात विक्री करण्यात येते. साधारण ४० ते ४५ रुपये प्रतीकिलो दराने हा कापूस बाजारात विकत घेतला जातो. वाहनातून रस्त्यावर पडणाºया व सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित राहणाºया कापसाला अनेकांनी आपल्या कमाईचे साधन बनविले आहे.

रस्त्यावर पडलेल्या या कापसाला स्वछ करून अनेक जणांनी हजारो रुपयांचे उत्पन्न घेतल्याची उदाहरणे आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील खापर नजीक असलेल्या कौलीगव्हाण या गावातील अत्र्या गोड्या वसावे हे नव्वदी पार केलेल्या वृद्ध दररोज रत्यावर व रस्त्यालगत पडलेला कापूस नित्यनियमाने गोळा करतात. त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण व कुतूहलाचा विषय बनले आहेत. खापर ते अक्कलकुवा दरम्यान आठ ते दहा किलोमीटर अंतरात ते दिवसाला तब्बल सात ते आठ किलो कापूस गोळा करीत असून मागील अनेक वर्षापासून ते हे काम करीत असल्याचे सांगतात. त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.