शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: March 27, 2017 00:14 IST

अक्कलकुवा तालुक्यात समस्या : नाल्यातील झºयातील पाण्याचा आधार

वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागातील वडफळी, कुकडीपादर व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या पाड्यांवर पाणी टंचाई तीव्र झाली आहे़ या तीव्रतेत पाड्यांवर टाकलेले नादुरुस्त हातपंप  अधिक भर टाकत आहेत़ बंद पडलेल्या हातपपांमुळे चापडी येथे काही दिवसांपूर्वी आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी पाणीच न मिळाल्याने तीन घरे भस्मसात झाली होती़   
अक्कलकुवा तालुका प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गम भागातून वाहणारे नदी व नाल्याचे पाणी आटल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ चापडी गावासह पाड्यांवर ठिकठिकाणी नादुरुस्त झालेल्या हातपंपांची दुरुस्ती करून पाणीटंचाईतून सुटका करण्याची मागणी करूनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ 
अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागातील कुकडीपादर, वडफळी व हुणाखांब या तीन ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गठाणीपाडा, म्हेलेंटेबापाडा, तुरवीराहीपाडा, वड पाडा, अरेठी, अरेठीचा तुरविहीपाडा, निंबीपाडा, बोरखापाडा, केवडी, गालीसिबाडीपाडा, बाराआंबापाडा, गामाईपाडा, देवचापडापाडा, रमणपाडा, केवडापाडा, सरपंचपाडा, चावडी, वावीपाडा, माथापाडा, एकलापाडा, वडफळी, होळीदेवपाडा, रुबजीपाडा, गोलापाडा, खाळपाडा, खमळपाडा, बगदा, जांबीपाडा, हनुमानमंदिर पाडा, पांढरामाती, पुंजारापाडा, महाराजपाडा, माजी सरपंचपाडा, मोरही, उमराईपाडा, मोरही गाव, मोवान, शेल्टीपाडा, काजीआंबापाडा, मोकस, सोगाआंबापाडा, पुवरापाडा, तडवीपाडा, हुणाखांब, खाटीआंबापाडा, डोंगºयापाडा, चनवाईपाडा, लोहारपाडा याठिकाणी पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे़ नदी नाले पूर्णपणे कोरडे झाल्याने महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात नाल्यांंमध्ये केलेल्या शेवड्या आणि झºयांमधून पाणी आणत आहेत़ हे झरे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वेळ लागत असल्याने उन्हातान्हात महिला त्याठिकाणी बसून रहात असल्याचे दिसून येत आहे़ यापूर्वीही गेल्या महिन्यात या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही़
पाणीटंचाईग्रस्त पाड्यांची संख्या वाढतच जाणार असल्याने             तालुका प्रशासनाने पाड्यांवर हातपंप दुरुस्तीचे पथक पाठवण्याची मागणी आहे़ यासोबत नव्याने हातपंपांची निर्मिती करण्यासाठी सर्वेक्षण यंत्रणा राबवण्याची गरज असल्याचे मत दुर्गम भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे़