शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मिळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:39 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यापीठ एकीकडे अंतिम वर्ष वर्गाची परीक्षा घेण्यासाठी तयारी करीत आहे. दुसरीकडे ...

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यापीठ एकीकडे अंतिम वर्ष वर्गाची परीक्षा घेण्यासाठी तयारी करीत आहे. दुसरीकडे मात्र, द्वितीय व तृतीय वर्ष वर्गाचे अवघे ६० ते ७५ टक्के प्रवेश पुर्ण झाले आहेत. प्रथम वर्ष प्रवेशासाठी मात्र प्राध्यापकांना गावोगावी जाऊन विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. ग्रामिण भागातील महाविद्यालयांसह शहरी भागातील नामांकित महाविद्यालयांवर ही वेळ यंदा आली आहे. तरीही आॅगस्ट अखेर प्रथम वर्षाचे २५ टक्के प्रवेश देखील पुर्ण झाले नसल्याची स्थिती आहे.
कोरोनामुळे यंदा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम, द्वितीय वर्ष वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. प्रथम सत्राच्या परिक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल लागून दोन महिने झाले तरी विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी येत नाहीत. किंवा आॅनलाईन प्रवेश देखील घेत नसल्याची स्थिती आहे. १२ वी परीक्षेचा निकाल लागून देखील दीड महिना लोटला तरीही प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी येत नसल्याचे चित्र आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांची सारखीच स्थिती आहे.
आॅनलाईन : पण अडचणी फार
विद्यापीठाने आॅनलाईन प्रवेशासाठीची सोय विद्यार्थ्यांना करून दिली आहे. त्यासाठीची प्रक्रिया देखील सोपी केलेली आहे. परंतु ग्रामिण तसेच सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीची अडचण, प्रक्रिया समजण्यातील अडचणी यामुळे आॅनलाईन प्रवेशाला देखील तब्बल दोन महिने होऊनही अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. महाविद्यालयांनी द्वितीय व तृतीय वर्ष वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून प्रवेशाची संमती घेतली आहे. आधीच महाविद्यालयांकडे असलेल्या डाटावरून प्रवेश अर्ज भरण्यात येत आहे. तरीही २५ ते ३० टक्के प्रवेश अद्यापही बाकी आहेत.
अनेक तुकड्या रिक्त राहतील
यंदा प्रथम वर्ग वर्गाच्या अनेक तुकड्या रिक्त राहण्याची शक्यता सर्वच महाविद्यालयांमध्ये राहणार आहे. या तुकड्यांबाबत विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागून आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या तुकड्यांची अवस्था वाईट राहणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. कोरोनामुळे प्रथमच प्राध्यापकांवर विद्यार्थी शोध मोहिम राबवावी लागत आहे.


१२ वी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतात. त्यामुळे आधीच महाविद्यालयांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते. यावेळी तर कोरोनाचे संकट आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले, परंतुु शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमधील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अद्यापही आपले गुणपत्रक आणि एल.सी. नेलेली नसल्याची स्थिती आहे. अशा वेळी पुढील वर्गात प्रवेशाबाबत तर बोलणेच नको अशी स्थिती आहे.


प्रथम वर्ष कला, विज्ञान आणि वाणिज्य वर्गाच्या प्रवेशासाठी प्राध्यापकांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत अकरावी कला शाखेत प्रवेशासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागत होते.
आता वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना देखील विद्यार्थी शोध मोहिमेवर जावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात प्रथमच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांवर ही वेळ आली असल्याचे अनेक प्राध्यापकांनी कबुल केले.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरून दिला व घेतला जात आहे.
 शैक्षणिक शुल्क भरून देणे, महाविद्यालय सुरू झाल्यास एस.टी.पास काढून देणे, पुस्तके उपलब्ध करून देणे, आगामी काळात वसतिगृहात रहावयाचे असल्यास त्याची सोय करून देणे आदी प्रकारचे अमिष दाखविले जात आहे.
यासाठी काही महाविद्यालयांनी प्राध्यापकांना ठराविक गावांचा भाग ठरवून देत विद्यार्थी टार्गेट देखील दिले असल्याचे चित्र आहे.