शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे धनी ठरले. बहुतांश कामे आॅनलाईन झाली, परंतु मोलगीत सेवेअभावी कामे होत नसल्याने तक्रारी वाढल्या. असे असतांनाच राज्यपाल कोश्यारी दौऱ्यावर आले, दरम्यान दूरसंचार सेवेबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार टॉवरसाठी स्वतंत्र सौर उर्जेचे पॅनल मजूर करीत दूसंचार सेवा सुरळीत करण्यात आली.दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणांपैकी मोलगी हे गाव असून तेथे तीन राज्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तेथे सर्वच सुविधांची आवश्यकता भासत असते. परंतु सद्यस्थितीत अतिमहत्वाची ठरणारी दूरसंचार सेवाच मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात आल्या. तर आॅनलाईन कामे रखडत असल्याने ग्रहकांमधील संतापाची तीव्रताही वाढली. दरम्यान संतप्त ग्राहकांकडून टॉवर जाळण्याची तयारीही करण्यात आली होती. काही महिन्यापासून सेवा पूर्णत: बंद पडली असतांनाच राज्यपाल कोश्यारी हे मोलगी दौºयावर आले होते.राज्यपालांच्या दौºयाच्या वेळेसही दूरसंचार विभागाची हीच परिस्थितीत तेथे पाहायला मिळाली. तर नागरिकांकडूनही याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींचा आढावा घेतता असता. वीज वितरणकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे दूरसंचारच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. तेथील सेवेची गरज लक्षात घेत बीएसएनएलमार्फत मोलगी टॉवरसाठी स्वतंत्र सौर पॅनल मंजूर झाले. त्यामुळे मोलगीसह परिसरातील ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणार असल्याची माहिती अभियंता तसेच केंद्राचे प्रभारी गिरासे यांनी दिली.४नव्याने बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची क्षमता तीन किलो वॅट आहे. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. या टॉवरची क्षमता पाच किलो मिटरची असल्याचे सांगण्यात येत असल्याने मोलगीकर, बाजार व अन्य कामानिमित्त येणारे नागरिकांसह भगदरी, काठी, निंबीपाडा, बिजरीपाटी, साकलीउमर, बोतवा, उखिल्ली सोरासापडा बिजरीगव्हाण येथील ग्राहकांनाही या टॉवरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.४खंडीत वीज पुरवठ्यामुळे दूसंचारच्या सेवेवर मोठा परिणाम होत होता. अपेक्षित वीज पुरवठा करण्यासाठी बीएसएनएलकडून वीज वितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बीएसएनएलने स्वतंत्र सौर ऊर्जेचे पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी निती आयोगाकडे दि. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव देत मागणी केली होती. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही पाठपुरावा करण्यात आला. परंतु या पॅनलसाठी कुठल्याही हालचाली होतांना दिसून आल्या नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची कुठलीही प्रतिक्षा न करता बीएसएनएलमार्फतच स्वतंत्र पॅनल मंजूर करण्यात आले आहे.