शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

वडझाकणला महाराजस्वअंतर्गत रस्ता काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियान गावपातळीवर राबविले जात आहे. या अभियानातंर्गत नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियान गावपातळीवर राबविले जात आहे. या अभियानातंर्गत नंदुरबार तालुक्यातील वडझाकण येथे शिवार फेरी, अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांदन रस्ते मोकळे करणे, विशेष शिबिर घेऊन दाखले वाटप करणे, शिधापत्रिका वितरित करणे, इत्यादी उपक्रम राबविले जात असून, याचा शुभारंभ सरपंच कोचऱ्या वळवी यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. 
या वेळी मंडळ अधिकारी अनेश वळवी, तलाठी बालाजी बिडकर, ग्रामसेवक व्ही.डी. वळवी, कृषी सहाय्यक गणेश पाटील, धारासिंग नाईक, गुलाब कोकणी, दिनेश वळवी, गुलाब पाडवी, रामसिंग वळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील वडझाकण येथे महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून गावाच्या परिसरात शिवार फेरी काढण्यात आली‌. शिवार फेरीतून पांदन रस्ता, गाडी रस्ता अतिक्रमित झाल्याचे निदर्शनास आले. अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासंदर्भात गावात दवंडी देऊन गावातील शेतकऱ्यांची बैठक तलाठी बिडकर यांनी घेतली. यात त्यांनी आपापसातील बांधावरील भांडण-तंटे सोडून सर्वांनी एकत्र येऊन अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याच्या कामात पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. 
या कामात लोकांनी सहभाग घेऊन हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. हा रस्ता अतिक्रमित असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना चिखलातून वाट काढत जावे लागत असे बैलगाडीदेखील जाणे शक्य नव्हते. शेतातील पिकवलेला माल डोक्यावर घेऊन घरी यावे लागत होते. ही पायपीट साऱ्‍या कुटुंबाला करावी लागत असे. अशावेळी कित्येक दिवसाचा अतिक्रमित झालेला रस्ता मोकळा होताना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.           रस्ता खुला झाल्याने १२७  शेतकऱ्यांना या रस्त्याचा वापरासाठी उपयोग होणार आहे. यामुळे शेतीमध्ये पोहोचण्यास लागणारा वेळ व श्रम यांची बचत होणार असून, शेतातील पिकविलेला माल वाहनाच्या किंवा बैलगाड्यांच्या साह्याने आणण्यास   मदत होणार आहे. शासनाच्या          विविध योजनांचा लाभ गावातच          मिळत असल्याने हे अभियान सर्वसामान्य माणसाला समाधान         देणारे असून, या अभियानाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात येत         आहे.