शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सव्वातीन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

तळोदा : कोरोना महामारीत शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांचाकडून सव्वातीन ...

तळोदा : कोरोना महामारीत शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांचाकडून सव्वातीन लाखांच्या दंड वसूल केला आहे. ही कारवाई त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात सुरू झालेली आहे. या लाटेने अत्यंत अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. यात रुग्णांचा मृत्यूदरदेखील चांगलाच वाढला आहे. साहजिकच यामुळे शासनास लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू करावे लागले आहे. कारण समाजातील ब्रेक द चेन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सामाजिक ‘दो गज की दूरी मास्क है जरूरी’ अशा नियमाचे पालन करण्याचं बंधन म्हणजे सक्ती नागरिकांना घालण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांना कडक अंमलबजावणी करण्याची सूचना वरिष्ठांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आदेशानुसार तळोदा पोलीसदेखील अशा बेजबाबदारांवर कारवाईसाठी सक्रिय झाले आहेत. याकरिता त्यांनी भरारी पथक नियुक्त केले आहे. दिवसभर हे पथक बिगर मास्क व सामाजिक दुरीचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर वाॅच ठेवत असते. गेल्या जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत म्हणजे चार महिन्यांत तब्बल तीन हजार ६३३ जणांवर केसेस दाखल करून त्यांचाकडून तीन लाख २७ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात तब्बल एक हजार ३०५ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये वसूल केले आहेत. कोरोना महामारीमुळे पोलिसांनी उघडलेल्या या मोहीम बाबत विनामास्क फिरणाऱ्यांवर वचक बसलेला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच तोंडावर मास्क दिसून येतो. शासनाच्या या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, फौजदार अभय मोरे, फौजदार अविनाश केदार, पो. काॅ. अजय पवार, युवराज चव्हाण, अजय कोळी, अनिल वळवी, विलास पाटील, उमेश चौधरी व इतर कर्मचारी धडक कारवाई करीत आहेत. असे असले तरी या पथकाने शहरात प्रचंड होणाऱ्या गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची अपेक्षा आहे. शुक्रवार या बाजाराचा दिवशी गर्दी होणे समजू शकतो. मात्र, जनता कर्फ्यू वगळता इतर दिवशी कायम गर्दी होते. विशेष म्हणजे बँकांच्या ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळते. याला बँक प्रशासनदेखील वेसण घालत नसल्याचा आरोप आहे. पोलीस, महसूल प्रशासनाने अशा गर्दीला आवर घालण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी आहे.

याशिवाय भाजीपाला व किरकोळ फळ विक्रेते यांना चिनोद्या रस्त्यावर एका मोकळ्या जागेवर दुकानं थाटण्याकरिता मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु अजूनही अनेक व्यावसायिक शहरातील मेन रोड, मारुती मंदिर, बसस्थानक रोडवर व्यवसाय थाटत असल्याचे चित्र आहे. प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनदेखील ते तेथून उठायला तयार नाहीत. नगरपालिका म्हणते, व्यावसायिक आमचं ऐकायला तयार नाहीत, तर महसूल व पोलीस पालिकेला कारवाई करायच्या सूचना देतात. या तिन्ही यंत्रणांच्या मै-मैं, तू-तू मुळे व्यावसायिक शिरजोर झाले आहेत. त्यांचे प्रशासन काहीच बिघडवत नसल्यामुळे आमच्या बाबतीतच दुजाभाव का केला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.